AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनचे दरात घट होताच पुन्हा शेतकऱ्यांची तीच ‘खेळी’ पण, यावेळी येणार कामी, काय आहे बाजारपेठतले वास्तव?

हंगामाच्या सुरवातीपासूनच दर कमी झाले की सोयाबीनची विक्री न करता साठवणूक हा शेतकऱ्यांचा निर्णय आतापर्यंत तर कामी आला आहे. पण सध्या परस्थिती बदलत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा साठवणूकीचा घेतलेला निर्णय कितपत फायद्याचा ठरणार हे पहावे लागणार आहे.

सोयाबीनचे दरात घट होताच पुन्हा शेतकऱ्यांची तीच 'खेळी' पण, यावेळी येणार कामी, काय आहे बाजारपेठतले वास्तव?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली असून दर स्थिर आहेत.
| Updated on: Jan 20, 2022 | 2:19 PM
Share

लातूर : एक नाही दोन नाही तर गेल्या 15 दिवसांपासून (Kharif Season) खरीप हंगामातील मुख्य पिकाचे दर हे स्थिरावलेले होते. मात्र, याचा फारसा परिणाम आवक झाला नव्हता पण गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दरात घसरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच दर कमी झाले की (Soybean) सोयाबीनची विक्री न करता साठवणूक हा शेतकऱ्यांचा निर्णय आतापर्यंत तर कामी आला आहे. पण सध्या परस्थिती बदलत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा साठवणूकीचा घेतलेला निर्णय कितपत फायद्याचा ठरणार हे पहावे लागणार आहे. कारण गेल्या आठ दिवसांपासून महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या (Latur) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी 25 हजार पोत्यांची आवक होत होती पण दरात घट होताच गुरुवारी ही आवक थेट 15 हजार पोत्यांवरच आली आहे. त्यामुळे पहिले पाढे पंचावन अशी काहीशी अवस्था सोयाबीनची झाली आहे.

नेमका दरात कसा झाला आहे बदल

यापूर्वी डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली होती. 6 हजार 600 वरील दर थेट 6 हजार रुपये क्विंटलवरच येऊन ठेपले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता साठवणूकीवर भर दिला होता पण नववर्षाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे पुन्हा आवकवर परिणाम झाला होता. आता सोयाबीनच्या दरावरच आवक ही अवलंबून राहिलेली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये 6 हजार 500 असलेले सोयाबीन पुन्हा 6 हजार रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे विक्रीपेक्षा साठवणूकच बरी याचा प्रत्यय आला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 8 हजार पोत्यांची आवक ही कमी झाली आहे.

उन्हाळी सोयाबीनचा काय होणार परिणाम

बदलत्या परस्थितीमुळे यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात सोयाबीनचा प्रयोग करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ बिजोत्पादनासाठी हा प्रयोग केला जात होता पण यंदा उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीकोनातून क्षेत्र वाढले आहे. शिवाय मूबलक पाणी आणि पोषक वातावरण यामुळे उतारही चांगला येईल असा आशावाद आहे. मात्र, उन्हाळी सोयाबीनचा हंगाम सुरु झाला तर साठवणूक केलेल्या सोयाबीनचे काय करायचे हा प्रश्न आहे, त्यामुळे टप्प्याटप्याने सोयाबीनची विक्री हेच शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6560 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6600 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6630 रुपये क्विंटल, जानकी चना 4760 रुपये क्विंटल, विजय चणा 4700, चना मिल 4600, सोयाबीन 6220, चमकी मूग 6900, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 6750 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

Banana Farming: आवक घटली मागणी वाढली, अखेर केळीच्या दरात सुधारणा झाली

Sugarcane Crop: अतिरिक्त ऊसाचे गाळप रखडले पण क्षेत्र मोजायचे कसे? जानेवारी अखेरीस अहवालातून चित्र स्पष्ट

ही कसली दुश्मनी ? 35 एकरातील साठवलेल्या तुरीच्या गंजीची अज्ञातांकडून होळी, लाखोंची नुकसान

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.