AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जोडले हात, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला काय मिळणार मदत?

शासन स्तरावरुन जे मदतीचे निकष आहेत ते पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना त्वरीत मदत देण्याच्या अनुशंगाने गेवराईचे तहसील हे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार आहेत. त्यानंतर मदतीच्या अनुशंगाने जी काही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर काय स्थिती होते याची जाणीव आम्हालाही आहे.

Beed : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जोडले हात, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला काय मिळणार मदत?
बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 10:14 AM
Share

बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी हा (Surplus Sugarcane) अतिरिक्त ऊस उत्पादनाचा बळी ठरला आहे. उसाची तोड होत नसल्याने नामदेव आसाराम जाधव या 32 वर्षीय शेतकऱ्याने (Farmer Suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर मात्र, प्रशासन हे खडबडून जागे झाले आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे आता (Beed District) प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना हात जोडून विनंती केली आहे की, प्रश्न गंभीर असला तरी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. यावर लवकरच तोडगा काढला जाईल पण आत्महत्या हा काही त्यावरचा पर्याय नाही. अतिरिक्त ऊसाला घेऊन जाधव यांनी जे टोकाचे पाऊल उचलले आहे त्यानंतर जिल्ह्यात सर्व यंत्रणा ही कामाला लागली आहे तर दुसरीकडे नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना मदत देण्याच्या अनुशंगाने प्रयत्न सुरु झाले आहेत.

नेमकी काय होणार मदत?

शासन स्तरावरुन जे मदतीचे निकष आहेत ते पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना त्वरीत मदत देण्याच्या अनुशंगाने गेवराईचे तहसील हे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार आहेत. त्यानंतर मदतीच्या अनुशंगाने जी काही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर काय स्थिती होते याची जाणीव आम्हालाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी विनोद शर्मा यांनी सांगितले आहे.

ऊस पेटवून घेतला होता गळफास

राज्यात आणि त्यामध्येच मराठवाड्यात अतिरिक्त उसाचे प्रश्न हा कायम आहे. कालावधी पूर्ण होऊन देखील तोड होत नसल्याने असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. डोळ्यादेखत ऊसाचे होत असलेले नुकसान न सहन झाल्याने हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून गळफास घेतला. फडाला लागूनच असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेतला होता.

अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम

जिल्ह्यात 85 हजार हेक्‍टरवर उसाची लागवड झाली असून 55 लाख टन उत्पादन होणार आहे. तर पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपावीना शेतात पडून आहे. जेवढं शक्य होईल तेवढी लवकरच तोडणी केला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न हा गंभीर होता, प्रशासनाने मात्र वेळीच याकडे लक्ष दिलं असतं तर मात्र जाधव यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...