AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : अतिवृष्टीने खरडून गेलेला शिवार पुन्हा बहरणार, सरकारला जमले नाही ते प्रतिष्ठानने करुन दाखवलं!

गतवर्षी पिकांबरोबर शेतजमिनीवरील मातीही वाहून गेली होती. एवढेच नाही तर बांधबंदिस्तीही राहिली नसल्याने शेतकऱ्यांना सर्वकाही नव्यानेच करावे लागणार होते. आता ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतामध्ये माती टाकून बांधबंदिस्ती करुन दिली जाणार आहे. हे काम जेसीबीच्या माध्यमातून 20 दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.

Pune : अतिवृष्टीने खरडून गेलेला शिवार पुन्हा बहरणार, सरकारला जमले नाही ते प्रतिष्ठानने करुन दाखवलं!
भोर जि.पुणे येथील ध्रुलव प्रतिष्ठानच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतजमिनीचे दुरुस्तीचे काम केले जात आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 12, 2022 | 9:32 AM
Share

पुणे : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने केवळ (Crop Damage) पिकांचेच नुकसान झाले नव्हते तर शेतजमिनीही खरडून गेल्या होत्या. त्यामुळे शेती करायची कशी असा सवाल जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर होता. (Agricultural Land) शेती क्षेत्रावरील काळी मातीच पावसाच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही पिक घेता आले नाही. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन भोर येथील ध्रुव प्रतिष्ठान अनोखा उपक्रमच हाती घेतला आहे. शेतजमिनीचे नुकसान झालेल्या 15 ते 20 शेतकऱ्यांची जमिन दुरुस्ती करुन दिली जात आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे 1 हेक्टरपर्यंत क्षेत्र दुरुस्त केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या (Kharif Season) खरिपात या भागातील शेतकऱ्यांना चाढ्यावर मूठ ठेवता येणार आहे. शासनाकडून केवळ पंचनामे झाले मात्र, वर्ष उलटले तरी दुरुस्ती कामे झाली नसल्याने शेती करावी कशी असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण ध्रुव प्रतिष्ठाणच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेत यंदाच्या हंगामात बहरणार आहे.

दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हात

गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेत जमिनीही ह्या खरडून गेल्या होत्या. यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि राजकिय नेत्यांकडून पाहणी आणि मदतीच्या घोषणा झाल्या प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे झालीच नाही. त्यामुळे रब्बी हंगाम तर गेलाच पण उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा खरीपही हातचा जाणार ही भीती शेतकऱ्यांमध्ये होती. खरिपातील पेरणीसाठी वाढलेला खर्च आणि त्यात ही दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांना शक्य नाही. मात्र, भोर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या भूमिकेमुळे या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. शेतीच्या आणि बांधाच्या दुरुस्तीचे काम होत आहे. खरीप पेरणीच्या आगोदर शेतकऱ्यांना हे शेत दुरुस्त करुन दिले जाणार आहे.

कसे असणार आहे दुरुस्तीचे काम?

गतवर्षी पिकांबरोबर शेतजमिनीवरील मातीही वाहून गेली होती. एवढेच नाही तर बांधबंदिस्तीही राहिली नसल्याने शेतकऱ्यांना सर्वकाही नव्यानेच करावे लागणार होते. आता ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतामध्ये माती टाकून बांधबंदिस्ती करुन दिली जाणार आहे. हे काम जेसीबीच्या माध्यमातून 20 दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. जेणेकरुन खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

अतिवृष्टी दरम्यान झाला होता घोषणांचा पाऊस

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय मंडळीची रीघ लागली होती. ज्याप्रमाणे पिकांचे नुकसान झाले आहे त्याही पेक्षा शेत जमिनी खरडून गेल्याने आगोदर शेतजमिनी दुरुस्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. आता वर्ष पूर्ण होत आहे. खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली आहे असे असताना दुरुस्ती तर नाहीच पण कसला दिलासाही सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नाही. ध्रुव प्रतिष्ठानच्या या मदतीमुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे.

Follow Us
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका