AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM kisan Yojna : ‘ई-केवायसी’ बाबत उदासिनता कायम, आता उरले 19 दिवस, अन्यथा लाभापासून वंचित..!

'ई-केवायसी'ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच आता यापुढे मुदतवाढ नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरीत 20 दिवसांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यात कायम आर्थिक मदत होणार आहे. योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया राबवली आहे.

PM kisan Yojna : 'ई-केवायसी' बाबत उदासिनता कायम, आता उरले 19 दिवस, अन्यथा लाभापासून वंचित..!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 11, 2022 | 6:32 AM
Share

उस्मानाबाद:  (e-KYC) ‘ई-केवायसी’ म्हणजेच शेतकऱ्यांना आपले (Bank Account) बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा मुतवाढ देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही शेतकऱ्यांमध्ये बाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळेच उस्मानाबाद जिल्ह्यात या (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेचे 2 लाख 80 हजार 423 लाभार्थी असताना केवळ 84 हजार 220 लाभार्थ्यांनीच आपला आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक असतानाही शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. योजनेचा 11 वा हप्ता केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही पूर्ण झाली असताना ‘ई-केवायसी’ केले नसल्याने अनेकांना 11 हप्ता जमा होतो की नाही याबाबत संभ्रमता आहे. शिवाय आता लाभार्थांकडे केवळ 20 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.

‘ई-केवायसी’ नाही केले तर काय?

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी’ई-केवायसी’ करणे हे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा लाभ मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया स्वत: लाभार्थ्यांलाही करता येते शिवाय ग्राहक सेवा केंद्रावरही आधार क्रमांक सांगून प्रक्रिया पूर्ण करता येते. सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ‘ई-केवायसी’ करता येते. यासाठी लाभार्थ्याला 200 रुपये खर्च आहे.

31 मे शेवटची मुदत

‘ई-केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच आता यापुढे मुदतवाढ नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरीत 20 दिवसांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यात कायम आर्थिक मदत होणार आहे. योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया राबवली आहे. गेल्या काही वर्षामध्ये जे पात्र नाहीत अशा नागरिकांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. ही बाब निदर्शनास आल्यावर ‘ई-केवायसी’ ला सुरवात करण्यात आली आहे. मात्र, शेतकरी अजूनही याबाबत गंभीर नाहीत.

असे करा मोबाईलवरुन ‘ई-केवायसी’

मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी प्रथम Google वरुन krushukranti.com या वेबसाईटवर जावे लागणार आहे. यामध्ये सर्वात शेवटी pmkisan Yojna आणि e-KYC असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी E-KYC हा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये pmkisan Yojna असा आशयाचे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूच्या Image मधील अक्षरे रिकाम्या जागी भरायची आहेत. त्यांनतर सर्च करायचे आहे . यामध्ये तुम्हाला अणखीन एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. यानंतर Get OTP यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP नंबर येईल. तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे.त्यानंतर Submit For Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वरती e-KYC is Success असा SMS येईल.

Follow Us
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ