AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM kisan Yojna : ‘ई-केवायसी’ बाबत उदासिनता कायम, आता उरले 19 दिवस, अन्यथा लाभापासून वंचित..!

'ई-केवायसी'ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच आता यापुढे मुदतवाढ नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरीत 20 दिवसांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यात कायम आर्थिक मदत होणार आहे. योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया राबवली आहे.

PM kisan Yojna : 'ई-केवायसी' बाबत उदासिनता कायम, आता उरले 19 दिवस, अन्यथा लाभापासून वंचित..!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 11, 2022 | 6:32 AM
Share

उस्मानाबाद:  (e-KYC) ‘ई-केवायसी’ म्हणजेच शेतकऱ्यांना आपले (Bank Account) बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा मुतवाढ देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही शेतकऱ्यांमध्ये बाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळेच उस्मानाबाद जिल्ह्यात या (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेचे 2 लाख 80 हजार 423 लाभार्थी असताना केवळ 84 हजार 220 लाभार्थ्यांनीच आपला आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक असतानाही शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. योजनेचा 11 वा हप्ता केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही पूर्ण झाली असताना ‘ई-केवायसी’ केले नसल्याने अनेकांना 11 हप्ता जमा होतो की नाही याबाबत संभ्रमता आहे. शिवाय आता लाभार्थांकडे केवळ 20 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.

‘ई-केवायसी’ नाही केले तर काय?

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी’ई-केवायसी’ करणे हे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा लाभ मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया स्वत: लाभार्थ्यांलाही करता येते शिवाय ग्राहक सेवा केंद्रावरही आधार क्रमांक सांगून प्रक्रिया पूर्ण करता येते. सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ‘ई-केवायसी’ करता येते. यासाठी लाभार्थ्याला 200 रुपये खर्च आहे.

31 मे शेवटची मुदत

‘ई-केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच आता यापुढे मुदतवाढ नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरीत 20 दिवसांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यात कायम आर्थिक मदत होणार आहे. योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया राबवली आहे. गेल्या काही वर्षामध्ये जे पात्र नाहीत अशा नागरिकांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. ही बाब निदर्शनास आल्यावर ‘ई-केवायसी’ ला सुरवात करण्यात आली आहे. मात्र, शेतकरी अजूनही याबाबत गंभीर नाहीत.

असे करा मोबाईलवरुन ‘ई-केवायसी’

मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी प्रथम Google वरुन krushukranti.com या वेबसाईटवर जावे लागणार आहे. यामध्ये सर्वात शेवटी pmkisan Yojna आणि e-KYC असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी E-KYC हा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये pmkisan Yojna असा आशयाचे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूच्या Image मधील अक्षरे रिकाम्या जागी भरायची आहेत. त्यांनतर सर्च करायचे आहे . यामध्ये तुम्हाला अणखीन एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. यानंतर Get OTP यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP नंबर येईल. तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे.त्यानंतर Submit For Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वरती e-KYC is Success असा SMS येईल.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...