AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊस उत्पादकांसाठी मोठा निर्णय, पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळणार, हर्षवर्धन पाटील यांची माहिती

1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्यात येणार आहे. Harshwardhan Patil ethanol petrol

ऊस उत्पादकांसाठी मोठा निर्णय, पेट्रोलमध्ये  20 टक्के इथेनॉल मिसळणार, हर्षवर्धन पाटील यांची माहिती
ऊस
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 04, 2021 | 5:12 PM
Share

पुणे: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्यात येणार आहे. या पूर्वी 10 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याचा निर्णय झाला होता. तो आता 10 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. (BJP Leader Harshwardhan Patil said Centre gave permission to 20 percent ethanol mixing in petrol)

देशातील साखऱ कारखाने आणि ऊस उत्पादकांना लाभ होणार

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविषयी माहिती दिली. केंद्र सरकारनं त्या निर्णयाबद्दल राजपत्र प्रसिद्ध केल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्राचा निर्णय देशातील साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगाला व देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊस उत्पादन बाय-प्रोडक्ट च्या माध्यमातून आर्थिक बळकटी मिळणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

1 एप्रिल 2023 पासून अंमलबजावणी

पेट्रोलियम मंत्रालयाने एका अधिसूचनेनुसार ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारतीय मानक ब्युरोच्या नियमांनुसार तेल कंपन्या 20 टक्के इथॅनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करतील. ही अधिसूचना 1 एप्रिल 2023 पासून अंमलात येईल.

गेल्या वर्षी केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉल 10 टक्केपर्यंत मिश्रित करण्यास परावनगी दिली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची अंतिम मुदत 2022 पर्यंत आहे. यानंतर आता इथेनॉलचं प्रमाण वाढवण्याचा निर्णय झाला आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्यासाठी पहिल्यांदा 2030 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती 2025 पर्यंत करण्यात आली. केंद्राच्या नव्या निर्णयानुसार आता 1 एप्रिल 2023 पासून इथेनॉल मिश्रित करावं लागणार आहे. ज्यावेळी हा निर्णय अंमलात येईल त्यावेळी 10 अब्ज लिटर इथेनॉलची गरज लागणार आहे.

संबंधित बातम्या:

TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती

मान्सूनची महाराष्ट्राकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता

भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

(BJP Leader Harshwardhan Patil said Centre gave permission to 20 percent ethanol mixing in petrol)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली