AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video ! सक्तीची वीजबिल वसुली थांबवा ; मुंबई-आग्रा महामार्गावर भाजपचा रास्तारोको

सध्या एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दिवसभरात किमान एकदा तरी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा ही होतेच मात्र, असे असूनही समस्यांवर तोडगा निघत नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या काळातच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबई-आग्रा या महामार्गावर भाजपाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नेतृत्वामध्ये रास्तारोको करण्यात आला होता.

Video ! सक्तीची वीजबिल वसुली थांबवा ; मुंबई-आग्रा महामार्गावर भाजपचा रास्तारोको
शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भाजपच्या वतीने मुंबई-आग्रा या महामार्गावर रास्तारोको करण्यात आला होता.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 27, 2021 | 1:57 PM
Share

लासलगाव : सध्या एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दिवसभरात किमान एकदा तरी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा ही होतेच मात्र, असे असूनही समस्यांवर तोडगा निघत नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या काळातच (State Government) सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबई-आग्रा या महामार्गावर भाजपाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नेतृत्वामध्ये रास्तारोको करण्यात आला होता. ऐन गर्दीच्या प्रसंगीच हा रास्तारोको करण्यात आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Electricity connections) विजजोडणी पासून ते नुकसानभरपाई बाबतच्या मागण्या या आंदोलना दरम्यान करण्यात आल्या होत्या. तब्बल 2 तास सुरु असलेल्या रास्तारोकोमध्ये शेतकरी आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

काय आहेत मागण्या ?

यंदाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या काळात बळीराजाला हातभार लावण्याचे काम हे मायबाप सरकारचे असते, मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये हे महाविकास आघाडी सरकार अपयशी झाल्याचा आरोप यावेळी आ. राहुल आहेर यांनी केला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी 50 हजाराची मदत करावी, पिकवीमा भरलेल्या शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट मदत करावी, सक्तीची विजबील वसुली रद्द करुन विजजोडणी करावी एवढेच नाही तर नादुरुस्त झालेले रोहित्र शेतकऱ्यांना 24 तासाच्या आतमध्ये दुरुस्त करुन देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी : आ. आहेर

शेतकऱ्यांना यंदा नैसर्गीक आपत्तीबरोबरच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे होते. उलट रब्बी हंगामातील पीके बहरात असतानाच राज्य सरकारने विद्युत पुरवठा खंडीत करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्य आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजपचे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी केला आहे.

रास्तारोको दरम्यान माणुसकीचे दर्शन

मुंबई-आग्रा या महामार्गावर रास्तारोको सुरु असताना अचानक रुग्णवाहिका आली होती. त्या दरम्यानच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र, वाहनांच्या गर्दीमधून त्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देण्यासाठी आंदोलनकर्तेही सरसावले होते. अवघ्या काही मिनिटांमध्येच रुग्णवाहिकेला मार्ग देऊन आंदोलनकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवून दिले होते.

मास्क नाही, तर भाजी नाही; ओमिक्रॉनची झळ थेट किचनपर्यंत, काय प्रकरण वाचा!

पुन्हा पावसाचे धोका : प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

हळद शेतीमाल नाही तर मग काय? सांगलीतील व्यापाऱ्यांचा प्रश्न, आक्रमक पवित्र्यानंतर निघणार का तोडगा..!

Cotton Rate : सोयाबीनप्रमाणेच कापसाचीही अवस्था, शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!