AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा पावसाचे धोका : प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

रब्बीच्या पेरणी दरम्यान आणि आता पीके बहरात असताना पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे राहत आहे. हवामान विभागाने डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेतली तरच रब्बी हंगामातील पीके बहरत राहणार आहेत.

पुन्हा पावसाचे धोका : प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 27, 2021 | 11:54 AM
Share

लातूर : रब्बीच्या पेरणी दरम्यान आणि आता पीके बहरात असताना पुन्हा (Untimey Rain) अवकाळी पावसाचे संकट उभे राहत आहे. हवामान विभागाने डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेतली तरच (Rabi season) रब्बी हंगामातील पीके बहरत राहणार आहेत. अन्यथा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. या वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम हा हरभरा आणि गव्हावर होणार आहे. त्यामुळे अळीचा आणि वाढत्या बुरशीचा बंदोबस्त हा शेतकऱ्यांना करावाच लागणार आहे. शिवाय खरीप हंगामातील तूर आणि कापसाचीही काढणी करुन साठवणूक महत्वाची राहणार आहे.

गव्हावर तांबोरा तर उर्वरीत पिकांना अळीचा धोका

पावसामुळे किंवा बदलत्या वातावरणामुळे गहू या रब्बी हंगामातील मुख्य पिकावर तांबोऱ्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताचा डोस देताना नत्र, स्फुरद, यांचे प्रमाण 2:1 ठेवावे. पिकास पाणी देताना बेताने व गरजेपुरतेच द्यावे. रोगाचे लक्षण दिसून येताच 2 ते 2.5 ग्रॅम डायथेन एम- 45 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो. गव्हाचे उत्पादन तर वाढलेले आहे पण वातावणातील बदलामुळे तांबोरा रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. गव्हावर तांबोरा रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ तर खुंटतेच पण वार्षिक उत्पन्न हे देखील घटते. त्यामुळे पावसाला सुरवात होण्यापूर्वीच अशाप्रकारे फवारणी केली तर त्याचा परिणाम होणार आहे.

बुरशीनाशकाची फवारणी

रब्बी हंगामातील पिकांच्या बुडाशी पाणी साचून राहिले किंवा वातावरणात दमटपणा आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे बुरशीनाशक म्हणून अॅडक्झेर हे औषध प्रभावी राहणार आहे. 15 लिटर पंपासाठी 30 मिली औषेध पाण्यात मिसळावे लागणार आहे. या मिश्रणात एक एकरामधील फवारणी होणार आहे. तर बीएसएफ चे ओपेरा हे एक बुरशीनाशक महत्वाचे ठरणार आहे. याचे प्रमाण देखील अॅडेक्झेर प्रमाणेच ठेवावे लागणार आहे. आता कुठे रब्बी हंगामातील पिके बहरत असताना पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापूर्वी आणि नंतरचे चार दिवस पिकांची काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे.

कापूस वेचणी अन् साठवणूक महत्वाची

खरीप हंगामातील कापूस आणि तूर ही दोनच पिके वावरात आहे. अधिकतर प्रमाणात काढणी झाली आहे. मात्र, फरदडचे उत्पादन काही शेतकरी हे घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा न करता शेतकऱ्यांनी फरदड कापूस काढला पाहिजे तर वेचलेल्या कापसाची योग्य ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. वेचणी झाल्यावर लगेच कापसाची झाडे ही शेताबाहेर काढून टाकावीत. तरच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा कमी होणार आहे. या बाबी क्षुल्लक असल्या तरी थेट पिकांवर परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

हळद शेतीमाल नाही तर मग काय? सांगलीतील व्यापाऱ्यांचा प्रश्न, आक्रमक पवित्र्यानंतर निघणार का तोडगा..!

Cotton Rate : सोयाबीनप्रमाणेच कापसाचीही अवस्था, शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

E-Shram Card : नाव नोंदणीला अडचण, एका फोनमध्ये प्रश्न मार्गी, अशी आहे प्रक्रिया..!

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!