Sugarcane sludge: क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप, तरीही ऊस फडातच, नेमकी चूक कारखान्यांची की शेतकऱ्यांची..!

यंदा ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. ऊस शिल्लक म्हणले की साखर कारखान्यांच्या कारभारावरच बोट ठेवले जाते. यंदाच्या हंगामात मराठवाडा विभागात तब्बल 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे. असे असतानाही मराठवाड्यातील लातूर, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. याला सर्वस्वी कारखानेच जबाबदार आहेत असे नाही तर गेल्या दोन वर्षात ऊसाच्या क्षेत्रात झालेली वाढही महत्वाची आहे.

Sugarcane sludge: क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप, तरीही ऊस फडातच, नेमकी चूक कारखान्यांची की शेतकऱ्यांची..!
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 11:27 AM

औरंगाबाद : यंदा (Sugarcane Sludge) ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. ऊस शिल्लक म्हणले की साखर कारखान्यांच्या कारभारावरच बोट ठेवले जाते. यंदाच्या हंगामात (Marathwada) मराठवाडा विभागात तब्बल 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे. असे असतानाही मराठवाड्यातील लातूर, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. याला सर्वस्वी (Sugar Factory) कारखानेच जबाबदार आहेत असे नाही तर गेल्या दोन वर्षात ऊसाच्या क्षेत्रात झालेली वाढही महत्वाची आहे. मराठवाड्यातील तब्बल 36 साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. असे असतानाही ऊस फडातच असून आता उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यंदाच्या हंगामात मराठावाड्यातील 59 साखर कारखान्यांनी सहभाग नोंदवला होता.

गाळप हंगाम सुरु होऊन 5 महिन्याचा कालावधी

15 ऑक्टोंबर रोजी राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी ही पेटलेली होती. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये साखरेची विक्रमी उत्पादन झाले आहे. शिवाय अनेत साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्यामुळे गाळप होऊ शकलेले नाही. यंदा ऊसाचे उत्पादन आणि क्षेत्र वाढीचाही परिणाम गाळपावर झालेला आहे. शिवाय अवकाळी आणि बदलत्या वातावरणामुळे ऊसतोडणीमध्ये खंडही निर्माण झाला होता. गेल्या 5 महिन्यापासून ऊसाचे गाळप हे सुरु असून मे अखेरपर्यंत सुरुच राहणार असल्याचा अंदाज आहे.

मराठवाड्याचेही योगदान

आतापर्यंत ऊस म्हणले की पश्चिम महाराष्ट्रच समोर येत होता. यंदा मात्र, मराठवाडा विभागात ऊसाचे गाळपही वाढले आणि साखरेचे उत्पादनही. हंगाम सुरु झाल्यापासून मराठवाड्यातील 59 साखर कारखान्यांच्या माध्यमातून 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे तर यातून 2 कोटी 43 लाख क्विंटलचे उत्पादन झाल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक 13 आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यातील 10 साखर कारखान्याच्या माध्यमातून अधिकचे गाळप आणि साखरेचे उत्पादन मिळालेले आहे.

क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप

मराठवाड्यातील 59 साखर कारखान्यांपैकी जवळपास 36 कारखाने हे दैनंदिन गाळप क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करीत आहेत. असे असतानाही ऊस फडातच आहे तो केवळ सरासरीपेक्षा कित्येक पटीने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे त्यामुळे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तर औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यातील प्रत्येकी 3 कारखान्यांनी अधिकचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांचा ऊस फडात हे खरे असले तरी लागवडीदरम्यान आवश्यक असलेली नोंदणी शेतकऱ्यांनीही केली नसल्याचे समोर येत आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : अवकाळीच्या नुकसान खुणा, चिकूची बाग उध्वस्त, फळगळतीने स्वप्नांचा चकणाचूर

Milk Price : दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’, गायी दुधाच्या दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ, दूध संघाचा निर्णय काय?

बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये घबराहट; कृषी खात्याची कारवाई

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.