AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane : साखर कारखाने बंद, अतिरिक्त उसाचे काय? ‘स्वाभिमानी’ करणार पोलखोल

राज्यात अतिरिक्त ऊसाचा सर्वाधिक प्रश्न हा मराठवाड्यात निर्माण झाला होता. अतिरिक्त उसाला घेऊन बीडमध्ये तर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या विभागातील जालना, उस्मानाबाद आणि बीडमध्ये अधिकच्या क्षेत्रावर ऊस शिल्लक राहिला होता. असे असताना साखर आयुक्तांनी कारखाने बंदची परवानगी दिलीच कशी असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

Sugarcane : साखर कारखाने बंद, अतिरिक्त उसाचे काय? 'स्वाभिमानी' करणार पोलखोल
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 15, 2022 | 5:41 PM
Share

पुणे : राज्यातील (Sugarcane Sludge) ऊस गाळपाचा हंगाम संपल्याचे जाहिर करीत साखर आयुक्तांच्या परवानगीने (Maharashtra) राज्यातील 198 साखर कारखाने बंदही करण्यात आले आहेत. शिवाय मराठवाड्यासह राज्यातील अतिरिक्त उसाचे गाळप झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, ऊसाची फडातील काय अवस्था आहे. याची पाहणी करुन संपूर्ण अहवाल घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (Raju Shetty) राजू शेट्टी हे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेणार आहेत. 1 लाख हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावरील ऊस शिल्लक असताना अचानक गाळप पूर्ण करुन साखर कारखानेही बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित करीत ही भेट होणार आहे. अतिरिक्त उसाबरोबर थकीत एफआरपी यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढला जावा या मागणीच्या अनुशंगाने ही भेट महत्वाची आहे.

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न

राज्यात अतिरिक्त ऊसाचा सर्वाधिक प्रश्न हा मराठवाड्यात निर्माण झाला होता. अतिरिक्त उसाला घेऊन बीडमध्ये तर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या विभागातील जालना, उस्मानाबाद आणि बीडमध्ये अधिकच्या क्षेत्रावर ऊस शिल्लक राहिला होता. असे असताना साखर आयुक्तांनी कारखाने बंदची परवानगी दिलीच कशी असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. एवढेच नाही तर आता मराठवाड्यातील शिल्लक उसाचा आढावा शेतकरी संघटनेकडून घेतला जाणार आहे. सध्या मराठवाड्यातील एक साखर कारखाना सुरु असल्याचे सांगितले जात असून त्याबाबतही शहनिशा केली जाणार आहे.

हंगामात 200 कारखान्यांकडून गाळप

यंदाचा हंगाम तब्बल 7 महिने सुरु राहिला होता. वाढते क्षेत्र आणि अधिकचे उत्पादन यामुळे क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम राहिला आहे. शिवाय साखर आयुक्तांकडून एक ना अनेक पर्याय समोर आले पण तोडगा काही निघाला नाही. राज्यात 200 साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप केले जात होते. आता 2 कारखाने सुरु असून 198 कारखान्यांची धुराडी बंद झाल्याचे साखर आय़ुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांच्या या समस्या कायम ?

उसाचा गाळप हंगाम संपल्याचे जाहिर कऱण्यात आले असले तरी प्रत्यक्षात स्थिती काय आहे? याचा लेखाजोखा आयुक्त कार्यालयाने सादर कऱणे गरजेचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली असती. ऊस शिल्लक राहिला तर अनुदान द्यावे ही मागणी शेतकऱ्यांची आहे. त्यावर कोणताही निर्णय न घेताच कारखाने बंद झाल्याचे घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त ऊस, थकीत एफआरपी, एफआरपीचे धोरण याबाबत प्रश्न उपस्थित केले जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ