AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton Crop : चाढ्यावर मूठ ठेवतानाच कपाशी बियाणांची विक्री, कशामुळे घ्यावा लागला कृषी विभागाला निर्णय?

कापसाला विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कपाशीवर वाढत असलेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हे त्रस्त आहेत. यातच हंगामपूर्व लागवड झाली तर त्याचा परिणाम हा इतर पिकांवरही होणार आहे. बोंडअळीमुळे केवळ पिकांचेच नाही तर शेतजमिनीचेही नुकसान होत आहे.

Cotton Crop : चाढ्यावर मूठ ठेवतानाच कपाशी बियाणांची विक्री, कशामुळे घ्यावा लागला कृषी विभागाला निर्णय?
यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ऐन हंगामाच्या सुरवातीला कापसाचे बियाणे विक्रीचा निर्णय घेतला आहे.
| Updated on: May 06, 2022 | 12:27 PM
Share

अहमदनर : सध्या (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग सुरु असली तरी कपाशीबाबत कमालीची शांतता आहे. सोयबीन बियाणे, बीजप्रक्रिया यासारख्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे पण कापसाची साधी चर्चाही नाही शिवाय यंदा (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला असताना ही अवस्था झाली आहे. कपाशीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी कपाशीवर पडणाऱ्या (Bond larvae disease) बोंडअळी रोगाचा परिणाम काय असतो याची कल्पना कृषी विभगाला सुरवातीपासूनच आहे. त्यामुळे कपाशीची हंगामपूर्व लागवड होऊ नये म्हणून कपाशी बियाणे विक्रीबाबत निर्बंध करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट 1 जून पासूनच बियाणे खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाणांसाठी अजून एक महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

बोंडअळीमुळे अधिकचे नुकसान

कापसाला विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कपाशीवर वाढत असलेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हे त्रस्त आहेत. यातच हंगामपूर्व लागवड झाली तर त्याचा परिणाम हा इतर पिकांवरही होणार आहे. बोंडअळीमुळे केवळ पिकांचेच नाही तर शेतजमिनीचेही नुकसान होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कृषी विभागाने 1 जूननंतरच कपाशी बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे धोरण ठरिवले आहे.

2017 मध्ये सर्वाधिक नुकसान, जीवनक्रम तोडण्यासाठी निर्णय

कपाशीवर बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सन 2017 मध्ये कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे 2018 ते 2021 दरम्यान विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यामुळे हा प्रादुर्भाव वाढत आहे. हंगामपूर्व कापूस लागवड खंडित न झाल्यामुळे अळीस पोषक वातावरण निर्माण होते. त्याचा प्रादुर्भाव पुन्हा इतर पिकांवरही होतो. त्यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापूस लागवड करता येऊ नये म्हणून हंगाम संपल्यावरच कापूस बियाणे बाजारात उपलब्ध करुन दिले आहे.

असे आहे कपाशी बियाणांचे नियोजन

हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत 1 ते 10 मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून 15 मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकऱ्यांना 1 जून नंतर विक्री केले जाणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...