AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : पदरात पडणारे पीक महावितरणने हिरावले, अपंग शेतकऱ्याच्या बाबतीत असे काय घडले?

शेतकरी कन्हैयालाल पाटील हे अपंग आहेत. असे असताना गेल्या 4 महिन्यापासू त्यांनी मका पिकाची जोपासणा केली होती. याकरिता औषध फवारणी, पाणी यासाठी त्यांनी अपार मेहनत केली. शिवाय पोषक वातावरणामुळे यंदा विक्रमी उत्पादन होईल असा विश्वास त्यांना होता. पण विद्युत तारांच्या घर्षणामुळे त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Jalgaon : पदरात पडणारे पीक महावितरणने हिरावले, अपंग शेतकऱ्याच्या बाबतीत असे काय घडले?
शॉर्टसर्किटमुळे कापणी झालेली मका जळून खाक झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यचे लाखोचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 01, 2022 | 2:25 PM
Share

जळगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा (Main Crop) मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी किमान जनावरांच्या (Animal Fodder ) चाऱ्याचा प्रश्न मिटावा यासाठी शेतकऱ्यांनी (Summer Season) उन्हाळी हंगामात मक्याची लागवड केली होती. पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे मका पीक जोमात बहरले. आता काढणी कामे सुरु आहेत. अशाचप्रकारे जिल्ह्यातील चाळीसगावातील चिंचखेड येथील शेतकऱ्याने मकाची काढणी केली होती. आता मळणी दोन दिवसांवर असतानाच शेतकरी कन्हैयालाल पाटील यांना महावितरणने असा काय शॉक दिला आहे की न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे तब्बल 4 एकरातील काढून टाकेलेल्या मकाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुष्काळात तेरावा, अपंग असतानाही मकाची जोपासणा

शेतकरी कन्हैयालाल पाटील हे अपंग आहेत. असे असताना गेल्या 4 महिन्यापासू त्यांनी मका पिकाची जोपासणा केली होती. याकरिता औषध फवारणी, पाणी यासाठी त्यांनी अपार मेहनत केली. शिवाय पोषक वातावरणामुळे यंदा विक्रमी उत्पादन होईल असा विश्वास त्यांना होता. पण विद्युत तारांच्या घर्षणामुळे त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. कापणी केलेली मका तर आगीच्या भक्ष्यस्थानीच आहे. तर दुसरीकडे मका भिजवण्यासाठी आणलेला ठिबक सिंचनही जळून खाक झाले आहे.

चाऱ्याचे दर गगणाला, आता जनावरे जगवायची कशी?

सध्या कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे हिरवा चारा तर दुरापस्त झाला असून या मका पिकावरच सर्वकाही अवलंबून होते. शिवाय कडब्याच्या दरातही वाढ झाल्याने तो विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मकाची विक्री आणि चारा असा दुहेरी लाभ पाटील यांना होणार होता. पण अवघ्या काही वेळेमध्ये होत्याचे नव्हते झाले. शार्टसर्किटमुळे झालेल्या दुर्घटनेत मका पीक तर जळालेच पण पाटील यांची मेहनत आणि स्वप्नाचाही चकणाचूर झाला.

नुकसानभरपाईची मागणी

यंदा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: ऊसाचे फड जळाल्याच्या अनेक घटना राज्यात झाल्या आहेत. आता हंगामी पिकावरही महावितरणची अवकृपा झाली असल्याने पाटील यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. शिवाय लागलीच ही प्रक्रिया पूर्ण करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसे उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.