AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : यंदा सोयाबीन अन् कापसामध्येच स्पर्धा, कृषी विभागाने वर्तविला खरिपाचा अंदाज

शेतीमालातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच पीक पध्दती ही ठरलेली आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे झालेले नुकसान पाहता यंदा खरिपात काय होणार अशी शंका उपस्थित केली जात होती. पण सोयाबीन आणि कापसाला मिळालेल्या दरातून खरिपातील चित्र स्पष्ट झाले आहे. उत्पादन घटले तरी उत्पन्न वाढल्याने आता यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे.

Kharif Season : यंदा सोयाबीन अन् कापसामध्येच स्पर्धा, कृषी विभागाने वर्तविला खरिपाचा अंदाज
बियाणे
| Updated on: May 01, 2022 | 10:10 AM
Share

अकोला : यंदाच्या विक्रमी दराचा परिणाम हा खरिपातील (Crop Sowing) पीक पेरणीवरही होणार आहे. विदर्भात (Kharif Season) खरिपात कापूस हे मुख्य पीक आहे तर मराठवाड्यात सोयाबीन. यंदाच्या हंगमात कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी मराठवाड्यापेक्षा विदर्भातच याचा अधिकचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे (Vidarbh Division) विदर्भात कापसाचे आणि मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर परिणाम झाला असला तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीन आणि कापसामध्येच स्पर्धा होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

वाढीव दराचा ‘असा’ हा परिणाम

शेतीमालातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच पीक पध्दती ही ठरलेली आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे झालेले नुकसान पाहता यंदा खरिपात काय होणार अशी शंका उपस्थित केली जात होती. पण सोयाबीन आणि कापसाला मिळालेल्या दरातून खरिपातील चित्र स्पष्ट झाले आहे. उत्पादन घटले तरी उत्पन्न वाढल्याने आता यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे. यंदा पीक पध्दतीमध्ये बदल न करता आहे त्या सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन वाढवण्यावर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.

अकोला जिल्ह्यातील खरीप क्षेत्र

अकोला जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 89 हजार एवढे आहे. यापैकी सोयाबीन 2 लाख 20 हजार हेक्टरावर तर कपाशीचे पीक हे 1 लाख 60 हजार हेक्टरावर अपेक्षित आहे. सोयाबीन, कापूस वगळता तूर 55 हजार, उडीद 16 हजार, ज्वारी 6 हजार तर मका 250 हेक्टर असे सरासरी क्षेत्र आहे. सोयाबीन आणि कापसाची लागवड ही सरासरीपेक्षा अधिक होईल असा अंदाज आहे. या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये तारले आहे. त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.

असे लागेल बियाणे

शेतकऱ्यांसह कृषी विभागही कामाला लागला आहे. यंदा सोयाबीन 1 लाख 65 हजार क्विंटल, तूर 2,888, मूग 994, उडीद 767, ज्वारी 450, मका 38, बाजरा कपाशी 4 हजार क्विंटल बियाणे लागेल. याबाबत कृषी विभागाकडून आयुक्तालयाकडे मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सोयाबीन हेच प्रमुख खरिपाचे पीक राहिलेले आहे. यावर्षी सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरपर्यंत लागवड शक्य आहे. वाढत्या दरामुळे सोयाबीन लागवडीला शेतकऱ्यांची पसंती राहणार आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.