AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paddy Crop : उन्हाळी हंगामात धान पिकाचे उत्पादन दणक्यात तरीही भंडाऱ्यातील शेतकरी चिंतेत, नेमकी काय आहेत कारणे?

भंडारा जिल्ह्यातील धानाची खरेदी ही शासकीय खरेदी केंद्रावरच केली जाते. खुल्या बाजारपेठेत दर कमी असल्याने शेतकरी खरेदी केंद्राचाच आधार घेतात. यंदाचे क्षेत्र आणि उत्पादन क्षमता पाहता 8 लाख 69 हजार क्विंटल खरेदीची मर्यादा देण्यात आली आहे. अधिकतर धानाची खरेदी व्हावी हा यामगचा उद्देश असला तरी उत्पादकता पाहता यंदाही संपूर्ण धानाची खरेदी होईल असे नाही.

Paddy Crop : उन्हाळी हंगामात धान पिकाचे उत्पादन दणक्यात तरीही भंडाऱ्यातील शेतकरी चिंतेत, नेमकी काय आहेत कारणे?
धान पीक
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 14, 2022 | 9:34 AM
Share

भंडारा : (Paddy Crop) धान पीक हे विदर्भातील मुख्य पीक आहे. दिवसेंदिवस उत्पादन आणि क्षेत्रात वाढ होत आहे. विक्रमी उत्पादन काढले तरी त्याची विक्री कुठे करायची असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांसमोर आहे. शासनाच्या माध्यमातून सुरु होणाऱ्या खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. यंदाचे उत्पादन आणि क्षेत्र पाहता खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मात्र, (Summer Season) उन्हाळी हंगामातील (A nurturing environment) पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांनी मर्यादा वाढवली असली तरी यंदा धान शिल्लक राहणार हे नक्की. त्यामुळे खरेदी केंद्र बंद होण्यापूर्वी त्याची विक्री करण्यासाठी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 88 हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.

अशी आहे खरेदी केंद्राची मर्यादा

भंडारा जिल्ह्यातील धानाची खरेदी ही शासकीय खरेदी केंद्रावरच केली जाते. खुल्या बाजारपेठेत दर कमी असल्याने शेतकरी खरेदी केंद्राचाच आधार घेतात. यंदाचे क्षेत्र आणि उत्पादन क्षमता पाहता 8 लाख 69 हजार क्विंटल खरेदीची मर्यादा देण्यात आली आहे. अधिकतर धानाची खरेदी व्हावी हा यामगचा उद्देश असला तरी उत्पादकता पाहता यंदाही संपूर्ण धानाची खरेदी होईल असे नाही. आतापर्यंतच्या कालावधीत 8 हजार 733 शेतकऱ्यांनी आपले धान विकले आहे. शिवाय मर्यादा पूर्ण होण्याअगोदर धानाची खरेदी केली जावी म्हणून खरेदी केंद्रावर दिवसरात्र वाहने उभा आहेत.

खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठीची प्रक्रिया

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत दर मिळावा म्हणून देशभर खरेदी केंद्र ही सुरु केली जातात. यामुळे खुल्या बाजारपेठेतील मनमानी दराला आळा तर बसतोच पण शेतकऱ्यांना वेळेत रक्कम आणि कोणता धोका राहत नाही. आता खेरीद केंद्रावर धानाची विक्री करायची असेल तर शेतकऱ्यास सातबारा उतारा, 8 अ, बॅंक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड आदी कागदपत्रे जमा करुन खरेदीसाठीची नोंदणी करावी लागते. त्यानंतर खरेदी केंद्रावरुन एसएमएस आल्यावर शेतकऱ्यांना आपला माल घेऊन यावा लागतो.

शेतकऱ्यांना चिंता कशाची?

यंदा धान खरेदी मर्यादा वाढवून दिली असली तरी उत्पादनातही वाढ झालेली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी 8 लाख 69 हजार क्विंटल खरेदीची मर्यादा देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांचा धान घरी आणले आहे. मात्र धान खरेदीच्या मर्यादने सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता. मध्यंतरीच्या काळात धान खरेदी ठप्प झाली होती, धान खरेदीची मर्यादा चार लाख क्विंटलवरून आता आठ लाख 69 हजार क्विंटल करण्यात आली आहे. धान खरेदीला वेग आला असला तरी धान शिल्लकच राहणार यामध्ये शंका नाही.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.