AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी म्हणतात, कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी उपाययोजना सुचवाव्यात, नाहीतर…

शेतीच्या पिकांवरती अनेकदा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी शेतकरी लागवड केल्यापासून पीक काढेपर्यंत पिकाची काळजी घेत असतात. अनेकदा असं पाहायला मिळतं की, शेतकरी रोगाचा प्रादुर्भाव पिकांवरती झाल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना गाठतात.

शेतकरी म्हणतात, कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी  उपाययोजना सुचवाव्यात, नाहीतर...
BANANA CULTIVATIONImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2023 | 9:26 AM
Share

नंदुरबार : शहादा (shahada) तालुक्यात शेतकऱ्यांनी (farmer news) मोठ्या प्रमाणात केळी (banana cultivation) आणि पपईची लागवड केली आहे. लागवड झाल्यानंतर दीड महिन्यात पपई आणि केळीच्या रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासाठी मागळ्या औषधांची फवारणी केली, त्याचबरोबर विविध द्रव्य खते चार ते पाच वेळीस दिल्याने शेतकऱ्यांचा मोठा खर्च या पिकांवर झाला आहे. मात्र तीव्र तापमान व विविध आजारांमुळे या रोपांची मोठ्या प्रमाणावर मर होत असल्याचे चित्र शहादा तालुक्यात परिसरात दिसत आहे. यावर्षी पपईचे रोप १४ रुपयांपासून तर १६ रुपयांपर्यंत मिळत आहे. केळीचे रोप १५ ते १७ रुपयापर्यंत शेतकरी विकत घेऊन लागवड केली आहे. परंतु पिकाची लागवड त्याचसोबत संगोपनाचा मोठा खर्च असल्याने मर रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी मर रोगाचे कारण शोधून त्यावर उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज

शेतीच्या पिकांवरती अनेकदा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी शेतकरी लागवड केल्यापासून पीक काढेपर्यंत पिकाची काळजी घेत असतात. अनेकदा असं पाहायला मिळतं की, शेतकरी रोगाचा प्रादुर्भाव पिकांवरती झाल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना गाठतात. त्यांना त्या पिकाची संपूर्ण माहिती देतात. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलेली औषधांची फवारणी पिकांवर करतात. त्यामुळे पीक पुन्हा जोमाने उभं राहतं. सध्या शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मागचे दोन हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाले होते.

जून महिना अर्धा संपला, तरी अद्याप देखील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. याचा परिणाम शेती पिकांच्या उत्पादनावर होत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक घटली आहे. यामुळे कोथंबीर, मेथी, शेपू, कांदापात, मिरची अशा भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोथिंबीर 70 ते 80 रुपये, मेथी 25 ते 30 रुपये, मिरची 50 ते 70 रुपये किलो असे दर सुरू आहे. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसतं आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.