AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात, बोगस बियाणांवरती जिल्हा कृषी विभागाचं लक्ष, कारवाईसाठी पथक तयार

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्गाचे अधिक हाल झाले आहेत. त्याचबरोबर अजून राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी इतकं उन्हं आहे की,शेतकऱ्यांच्या फळबागा करपून गेल्या आहेत.

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात, बोगस बियाणांवरती जिल्हा कृषी विभागाचं लक्ष, कारवाईसाठी पथक तयार
Agricultural departmetImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 20, 2023 | 2:21 PM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभाग (Agricultural departmet) अलर्ट मोडवर आहे. तब्बल 14 भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. एक जिल्हास्तरीय तर 13 तालुकास्तरीय पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात बोगस बियाण्यांची (bogus seeds) एन्ट्री होऊ नये म्हणून, बियाण्यांच्या बोगसगिरीवर सुद्धा कृषी विभागाची पथके करडी नजर ठेवून आहे. रब्बी हंगाम संपल्यानंतर खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकरी शेती मशागतीकडे वळत नाहीत. तोच मार्च तसेच एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला परिणामी, शेती मशागतीची कामेही प्रभावित झाली होती. मात्र मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि बियाणे खरेदी करताना गारपीट थांबल्याने गत 8-10 दिवसापासून शेती कामांना शेतकऱ्यांनी गती दिल्याचे दिसून येत आहे.

केळीच्या बागांना उन्हाचा फटका

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्गाचे अधिक हाल झाले आहेत. त्याचबरोबर अजून राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी इतकं उन्हं आहे की,शेतकऱ्यांच्या फळबागा करपून गेल्या आहेत. सगळ्यात जास्त केळीच्या बागांना उन्हाचा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या पुर्वतयारीला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. परंतु कडक उन्हं असल्यामुळे काम करीत असताना अनेक अडचणी येत आहेत. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला, त्यानंतर रब्बी हंगाम सुध्दा वाया गेला असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

भाव पडताच कांद्याच्या शेतात फिरवल्या शेळ्या अन् मेंढ्या

भुसावळ तालुक्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरपर्यंत आहे. पण, उन्हाळी कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा काढणी खर्चही निघत नाही. यामुळे हतबल झालेल्या गोजोरा व वांजोळा शिवारातील शेतकऱ्यांनी कांद्याच्या शेतात रोटोव्हेटर फिरवला. काही शेतकऱ्यांनी पिकात मेंढ्या चरायला सोडल्या. सध्या केवळ ३०० ते ५०० रुपये क्विंटलला दर मिळत आहेत. यामुळे मजुरीचा खर्चही निघत नाही. परिणामी वांजोळा येथील शेतकरी किशोर देवराम सावळे यांनी चार एकर, किरण भास्कर नेमाडे यांनी तीन एकर शेतात मेंढ्यांसह गुरे चराईसाठी सोडली.

बोगस बियाणे, खत विक्री केल्यास होणार कारवाई

बोगस बियाणे कुठेही आढळून आल्यास याची माहिती तुमच्या भागात असलेल्या कृषी विकास अधिकाऱ्याला द्यावी, त्यानंतर कृषी विकास अधिकारी त्या दुकानदारावर कारवाई करतात, राज्यात अनेक ठिकाणी कृषी साहित्य विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. चुकीची माहिती देऊन धान्य विक्री करणाऱ्यांवर सुध्दा कारवाई झाली आहे. ही कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी केली आहे.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.