AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात, बोगस बियाणांवरती जिल्हा कृषी विभागाचं लक्ष, कारवाईसाठी पथक तयार

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्गाचे अधिक हाल झाले आहेत. त्याचबरोबर अजून राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी इतकं उन्हं आहे की,शेतकऱ्यांच्या फळबागा करपून गेल्या आहेत.

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात, बोगस बियाणांवरती जिल्हा कृषी विभागाचं लक्ष, कारवाईसाठी पथक तयार
Agricultural departmetImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 20, 2023 | 2:21 PM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभाग (Agricultural departmet) अलर्ट मोडवर आहे. तब्बल 14 भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. एक जिल्हास्तरीय तर 13 तालुकास्तरीय पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात बोगस बियाण्यांची (bogus seeds) एन्ट्री होऊ नये म्हणून, बियाण्यांच्या बोगसगिरीवर सुद्धा कृषी विभागाची पथके करडी नजर ठेवून आहे. रब्बी हंगाम संपल्यानंतर खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकरी शेती मशागतीकडे वळत नाहीत. तोच मार्च तसेच एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला परिणामी, शेती मशागतीची कामेही प्रभावित झाली होती. मात्र मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि बियाणे खरेदी करताना गारपीट थांबल्याने गत 8-10 दिवसापासून शेती कामांना शेतकऱ्यांनी गती दिल्याचे दिसून येत आहे.

केळीच्या बागांना उन्हाचा फटका

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्गाचे अधिक हाल झाले आहेत. त्याचबरोबर अजून राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी इतकं उन्हं आहे की,शेतकऱ्यांच्या फळबागा करपून गेल्या आहेत. सगळ्यात जास्त केळीच्या बागांना उन्हाचा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या पुर्वतयारीला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. परंतु कडक उन्हं असल्यामुळे काम करीत असताना अनेक अडचणी येत आहेत. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला, त्यानंतर रब्बी हंगाम सुध्दा वाया गेला असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

भाव पडताच कांद्याच्या शेतात फिरवल्या शेळ्या अन् मेंढ्या

भुसावळ तालुक्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरपर्यंत आहे. पण, उन्हाळी कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा काढणी खर्चही निघत नाही. यामुळे हतबल झालेल्या गोजोरा व वांजोळा शिवारातील शेतकऱ्यांनी कांद्याच्या शेतात रोटोव्हेटर फिरवला. काही शेतकऱ्यांनी पिकात मेंढ्या चरायला सोडल्या. सध्या केवळ ३०० ते ५०० रुपये क्विंटलला दर मिळत आहेत. यामुळे मजुरीचा खर्चही निघत नाही. परिणामी वांजोळा येथील शेतकरी किशोर देवराम सावळे यांनी चार एकर, किरण भास्कर नेमाडे यांनी तीन एकर शेतात मेंढ्यांसह गुरे चराईसाठी सोडली.

बोगस बियाणे, खत विक्री केल्यास होणार कारवाई

बोगस बियाणे कुठेही आढळून आल्यास याची माहिती तुमच्या भागात असलेल्या कृषी विकास अधिकाऱ्याला द्यावी, त्यानंतर कृषी विकास अधिकारी त्या दुकानदारावर कारवाई करतात, राज्यात अनेक ठिकाणी कृषी साहित्य विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. चुकीची माहिती देऊन धान्य विक्री करणाऱ्यांवर सुध्दा कारवाई झाली आहे. ही कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी केली आहे.

अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल.
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत.
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.