AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतातल्या घराला आग लागली, भयानक आग पाहून लोकांनी…, संसार उघड्यावर आला

भीषण आगीमध्ये शेतातील घर जळून खाक झालंय, सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र घरातील सर्व साहित्य जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट

शेतातल्या घराला आग लागली, भयानक आग पाहून लोकांनी..., संसार उघड्यावर आला
घराला आग लागलीImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 20, 2023 | 9:06 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) शहरा जवळच्या कोलवड (kolvad) येथे एका शेतातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झालंय. काल सायंकाळी ही घडली असून ज्यांनी ही आग पाहिली आहे. त्यांना मोठा धक्का बसला आहे. कोलवड येथील झोपडपट्टीच्या मागे शेतकरी धोंडूबा गायकवाड (farmer) यांचे शेत असून, या शेतामध्येच त्यांनी घर बांधलेले आहे. विशेष म्हणजे आपल्या परिवारासह ते तेथेच राहतात. या शेतातील घराला काल सायंकाळी अचानक भीषण आग लागली. सुदैवाने आग लागली त्यावेळेस घरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.

मात्र, ही आग एवढी भीषण होती, की या आगीमध्ये टिन पत्र्याचे संपूर्ण घर, घरातील टीव्ही, अलमारी, दोन इलेक्ट्रिक मोटारी, ठिबक संच, दोन पलंग तसेच घरातील भांडीकुंडी सह इतर साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत शेतकरी धोंडूबा गायकवाड यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग कशामुळे लागली हे अद्यापही समोर आले नाही. शेतकरी गायकवाड यांचा संसार त्यामुळे उघड्यावर आला आहे.

पाण्याच्या टाकीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पळशी बुद्रुक गावात पाण्याच्या टाकीत बुडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर्यन नागे असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून त्याचे वडील आणि आजी बाजारात गेले असता तो एकटाच घरी होता. पाणी घेण्यासाठी तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि पाय घसरून टाकीत पडला. दरम्यान पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पळशी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे मुलांच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणाचा पंचनामा केला असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.