AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Inflation Effect: महागाईमुळे रुढी-परंपरेलाच पुन्हा महत्व, आता किराणा दुकानात नव्हे तेल घाण्यावर नागरिकांच्या रांगा

काळाच्या ओघात प्रक्रिया उद्योगामध्येही बदल झाले आहेत. पूर्वी शेतकरी तेलबिया घेऊन गिरण्यांवर जात होते. याठिकाणी प्रक्रिया करुन तेल दिले जात होते पण त्यानंतर खाद्यतेल थेट बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. शिवाय तेलघाण्याच्या गिरण्याही बंद पडल्या. जो-तो किराणा दुकानातूनच खाद्यतेलाची खरेदी करु लागले आहेत.

Inflation Effect: महागाईमुळे रुढी-परंपरेलाच पुन्हा महत्व, आता किराणा दुकानात नव्हे तेल घाण्यावर नागरिकांच्या रांगा
तेलाच्या वाढत्या दरामुळे आता घाण्यावरच तेल बनवून घेतले जात आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 11:23 AM
Share

नांदेड : दिवसेंदिवस (Inflation) महागाईच्या झळा अशा बसत आहेत की सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जीवनशैलीत बदल करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जीवनशैली तर बदलत आहेच पण नागरिकांना तडजोड करुन जीवन जगण्याची नामुष्की ओढावली आहे. (Fuel Rate) इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरची जागा आता बैलजोडी घेत आहे तर दुसरीकडे शेतकरी आता (Edible oil) खाद्यतेल विकत घेत नाही तर तेलबिंया गिरण्यांवर नेऊन तेल काढून आणत आहे. या दोन्ही बाबी केवळ वाढत्या महागाईमुळे आहेत. त्यामुळे बदलत्या काळात आत्याधुनिकतेचे महत्व सांगणारे सरकारच आता मूलभुत सोई-सुविधांसाठी मागे पडत आहेत. यंदाच्या वर्षात वाढत्या उन्हाच्या झळांपेक्षा महागाईच्या झळा अधिक तीव्र आहेत.

1990 पर्यंत काय होती स्थिती?

काळाच्या ओघात प्रक्रिया उद्योगामध्येही बदल झाले आहेत. पूर्वी शेतकरी तेलबिया घेऊन गिरण्यांवर जात होते. याठिकाणी प्रक्रिया करुन तेल दिले जात होते पण त्यानंतर खाद्यतेल थेट बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. शिवाय तेलघाण्याच्या गिरण्याही बंद पडल्या. जो-तो किराणा दुकानातूनच खाद्यतेलाची खरेदी करु लागले आहेत. मात्र, आता 1 किलो खाद्यतेलासाठी 200 रुपयांपेक्षा अधिकची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या तेलबियां गिरण्यांवर घेऊन जाऊ लागला आहे. यामध्ये केवळ प्रक्रियेसाठी लागणार खर्च घेतला जातो. त्यामुळे ज्यांच्याकडे तेलबिया आहेत ते शेतकरी आता थेट तेल घाण्यावर आढळून येत आहेत.

तेलघाण्याचे तेल शरिरासाठीही पौष्टीक

वाढत्या दरामुळे बाजारात 200 रुपये खर्ची करुन 1 किलो तेल घेण्यापेक्षा तेलबिया घेऊन घाण्यावर काढलेले तेल अधिक उत्तम. यामुळे उत्पादनावर खर्च तर नाहीच पण दर्जेदार असे तेल मिळते. जे मानवी शरिरासाठी पौष्टीक मानले जाते. ओढावलेली परस्थिती आणि शरिरासाठी होणारे फायदे लक्षात तेल घाण्यावरील तेलच पौष्टीक असे म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तेलघाण्यांवर गर्दी होत आहे. शेतकरी आपल्याकडील तेलबिया घेऊन तेल घेतो. याकरिता शेतकऱ्याला केवळ करणावळ द्यावी लागते.

करडईतून अधिकचा फायदा

आता खाद्यतेलांच्या दराचा भडका उडाल्याने अनेकजण तेलबियांतून तेल निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. करडई उत्पादकांनी तर करडईची विक्रीच केली नाहीत. त्यामुळे सर्वात महाग असलेले करडईचे तेल हे शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये मिळते. अधिकच्या दरासाठी शेतकऱ्यांनी करडईचे उत्पादन घेतले मात्र, अंतिम टप्प्यात अशाप्रकारे फायदा होताना शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.