AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Inflation Effect: महागाईमुळे रुढी-परंपरेलाच पुन्हा महत्व, आता किराणा दुकानात नव्हे तेल घाण्यावर नागरिकांच्या रांगा

काळाच्या ओघात प्रक्रिया उद्योगामध्येही बदल झाले आहेत. पूर्वी शेतकरी तेलबिया घेऊन गिरण्यांवर जात होते. याठिकाणी प्रक्रिया करुन तेल दिले जात होते पण त्यानंतर खाद्यतेल थेट बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. शिवाय तेलघाण्याच्या गिरण्याही बंद पडल्या. जो-तो किराणा दुकानातूनच खाद्यतेलाची खरेदी करु लागले आहेत.

Inflation Effect: महागाईमुळे रुढी-परंपरेलाच पुन्हा महत्व, आता किराणा दुकानात नव्हे तेल घाण्यावर नागरिकांच्या रांगा
तेलाच्या वाढत्या दरामुळे आता घाण्यावरच तेल बनवून घेतले जात आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 11:23 AM
Share

नांदेड : दिवसेंदिवस (Inflation) महागाईच्या झळा अशा बसत आहेत की सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जीवनशैलीत बदल करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जीवनशैली तर बदलत आहेच पण नागरिकांना तडजोड करुन जीवन जगण्याची नामुष्की ओढावली आहे. (Fuel Rate) इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरची जागा आता बैलजोडी घेत आहे तर दुसरीकडे शेतकरी आता (Edible oil) खाद्यतेल विकत घेत नाही तर तेलबिंया गिरण्यांवर नेऊन तेल काढून आणत आहे. या दोन्ही बाबी केवळ वाढत्या महागाईमुळे आहेत. त्यामुळे बदलत्या काळात आत्याधुनिकतेचे महत्व सांगणारे सरकारच आता मूलभुत सोई-सुविधांसाठी मागे पडत आहेत. यंदाच्या वर्षात वाढत्या उन्हाच्या झळांपेक्षा महागाईच्या झळा अधिक तीव्र आहेत.

1990 पर्यंत काय होती स्थिती?

काळाच्या ओघात प्रक्रिया उद्योगामध्येही बदल झाले आहेत. पूर्वी शेतकरी तेलबिया घेऊन गिरण्यांवर जात होते. याठिकाणी प्रक्रिया करुन तेल दिले जात होते पण त्यानंतर खाद्यतेल थेट बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. शिवाय तेलघाण्याच्या गिरण्याही बंद पडल्या. जो-तो किराणा दुकानातूनच खाद्यतेलाची खरेदी करु लागले आहेत. मात्र, आता 1 किलो खाद्यतेलासाठी 200 रुपयांपेक्षा अधिकची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या तेलबियां गिरण्यांवर घेऊन जाऊ लागला आहे. यामध्ये केवळ प्रक्रियेसाठी लागणार खर्च घेतला जातो. त्यामुळे ज्यांच्याकडे तेलबिया आहेत ते शेतकरी आता थेट तेल घाण्यावर आढळून येत आहेत.

तेलघाण्याचे तेल शरिरासाठीही पौष्टीक

वाढत्या दरामुळे बाजारात 200 रुपये खर्ची करुन 1 किलो तेल घेण्यापेक्षा तेलबिया घेऊन घाण्यावर काढलेले तेल अधिक उत्तम. यामुळे उत्पादनावर खर्च तर नाहीच पण दर्जेदार असे तेल मिळते. जे मानवी शरिरासाठी पौष्टीक मानले जाते. ओढावलेली परस्थिती आणि शरिरासाठी होणारे फायदे लक्षात तेल घाण्यावरील तेलच पौष्टीक असे म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तेलघाण्यांवर गर्दी होत आहे. शेतकरी आपल्याकडील तेलबिया घेऊन तेल घेतो. याकरिता शेतकऱ्याला केवळ करणावळ द्यावी लागते.

करडईतून अधिकचा फायदा

आता खाद्यतेलांच्या दराचा भडका उडाल्याने अनेकजण तेलबियांतून तेल निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. करडई उत्पादकांनी तर करडईची विक्रीच केली नाहीत. त्यामुळे सर्वात महाग असलेले करडईचे तेल हे शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये मिळते. अधिकच्या दरासाठी शेतकऱ्यांनी करडईचे उत्पादन घेतले मात्र, अंतिम टप्प्यात अशाप्रकारे फायदा होताना शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.