AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी वाऱ्याचा भाजीपाला पिकाला फटका, वीज पडून इतके शेतकरी दगावले; किती हेक्टरचे नुकसान?

सर्वात मोठे नुकसान झाले ते भाजीपाला पिकाचे. वीज पडून शेतकरी दगावल्याची माहिती आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

वादळी वाऱ्याचा भाजीपाला पिकाला फटका, वीज पडून इतके शेतकरी दगावले; किती हेक्टरचे नुकसान?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 20, 2023 | 6:27 PM
Share

भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. यात सर्वात मोठे नुकसान झाले ते भाजीपाला पिकाचे. वीज पडून शेतकरी दगावल्याची माहिती आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. त्यामुळे आता उद्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू होणार काय, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. पंचनामे करून त्वरित मदत द्यावी. पंचनामे सुरू करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.

सात जनावरांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात गारपिठीसह वादळी वाऱ्यासोबात आलेल्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. 80 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 7 जनावरांचा मृत्यू वीज पडल्याने झाला. तसेच 2 शेतकरी दगावले. 3 घरांचे नुकसान झाले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला आहे.

टमाटर जमीनदोस्त

या पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसला आहे. टमाटर शेतीला या गारपिटीचा मोठा फटका बसला. टमाटर गळून पडले आहेत. तोडणीला आलेला टमाटर जमीनदोस्त झाले आहेत. आधीच टमाटरला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. आता गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

गडचिरोलीत मिरचीचे मोठे नुकसान

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव जिल्ह्यातील तब्बल 32 गावे बाधित झाली आहेत. तर, गडचिरोली जिल्ह्यात गारपीट अवकाळी पावसामुळे हातात आलेले मिरची पिकाचे खुप मोठे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागत मोठ्या प्रमाणात मिरचीच्या उत्पादन शेतकरी घेत असतात. दुसरी तोडणी होण्याआधीच अवकाळी पाऊस आणि गारपीट पडल्यामुळे शेतात ठेवलेली मिरचीचे खूप नुकसान झाले.

पंचनामे सुरू होणार का?

गडचिरोली जिल्ह्यात 238.5 हेक्टर जमिनीचे नुकसान गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले. अनेक विभागाचे कर्मचारी जुनी पेन्शनचे आंदोलन असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अद्याप सर्वे किंवा पंचनामे सुरुवात झाले नाहीत. आज संप मिटला उद्यापासून पंचनामे सुरू होतात का हे पाहावं लागेल.

सर्वात मोठे नुकसान भाजीपाला पिकाचे झाले आहे. टमाटरचा खच पडला. गारपिटीने टमाटरचा लाल सडा पडलेला दिसला. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...