AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी वाऱ्याचा भाजीपाला पिकाला फटका, वीज पडून इतके शेतकरी दगावले; किती हेक्टरचे नुकसान?

सर्वात मोठे नुकसान झाले ते भाजीपाला पिकाचे. वीज पडून शेतकरी दगावल्याची माहिती आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

वादळी वाऱ्याचा भाजीपाला पिकाला फटका, वीज पडून इतके शेतकरी दगावले; किती हेक्टरचे नुकसान?
| Edited By: | Updated on: Mar 20, 2023 | 6:27 PM
Share

भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. यात सर्वात मोठे नुकसान झाले ते भाजीपाला पिकाचे. वीज पडून शेतकरी दगावल्याची माहिती आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. त्यामुळे आता उद्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू होणार काय, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. पंचनामे करून त्वरित मदत द्यावी. पंचनामे सुरू करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.

सात जनावरांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात गारपिठीसह वादळी वाऱ्यासोबात आलेल्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. 80 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 7 जनावरांचा मृत्यू वीज पडल्याने झाला. तसेच 2 शेतकरी दगावले. 3 घरांचे नुकसान झाले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला आहे.

टमाटर जमीनदोस्त

या पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसला आहे. टमाटर शेतीला या गारपिटीचा मोठा फटका बसला. टमाटर गळून पडले आहेत. तोडणीला आलेला टमाटर जमीनदोस्त झाले आहेत. आधीच टमाटरला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. आता गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

गडचिरोलीत मिरचीचे मोठे नुकसान

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव जिल्ह्यातील तब्बल 32 गावे बाधित झाली आहेत. तर, गडचिरोली जिल्ह्यात गारपीट अवकाळी पावसामुळे हातात आलेले मिरची पिकाचे खुप मोठे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागत मोठ्या प्रमाणात मिरचीच्या उत्पादन शेतकरी घेत असतात. दुसरी तोडणी होण्याआधीच अवकाळी पाऊस आणि गारपीट पडल्यामुळे शेतात ठेवलेली मिरचीचे खूप नुकसान झाले.

पंचनामे सुरू होणार का?

गडचिरोली जिल्ह्यात 238.5 हेक्टर जमिनीचे नुकसान गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले. अनेक विभागाचे कर्मचारी जुनी पेन्शनचे आंदोलन असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अद्याप सर्वे किंवा पंचनामे सुरुवात झाले नाहीत. आज संप मिटला उद्यापासून पंचनामे सुरू होतात का हे पाहावं लागेल.

सर्वात मोठे नुकसान भाजीपाला पिकाचे झाले आहे. टमाटरचा खच पडला. गारपिटीने टमाटरचा लाल सडा पडलेला दिसला. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.