AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांना आणखी एक धक्का! पुढील 10 दिवसात अंड्याचे दर वाढण्याची शक्यता

महिनाअखेरीस चिकन आणि अंड्याच्या भावात 25 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु जास्त खर्चामुळे चांगले उत्पन्न मिळवू शकणार नाही यामुळे शेतकरी निराश आहे.

सर्वसामान्यांना आणखी एक धक्का! पुढील 10 दिवसात अंड्याचे दर वाढण्याची शक्यता
सर्वसामान्यांना आणखी एक धक्का! पुढील 10 दिवसात वाढू शकतात अंड्याचे दर
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 11:07 PM
Share

मुंबई : आधीच कोरोनाने बेजार झालेला शेतकरी आता कुक्कुटपालनामध्येही चिंतेत सापडला आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, यावेळी बाजारातील मागणीनुसार पुरवठा होत नाही. कुक्कुटपालनात सोयाबीनच्या वाढत्या किमतींचा परिणाम पाहता 1.5 दशलक्ष टन सोयाबीन आयात करण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असूनही पोल्ट्री उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचे दिसत आहे. महिनाअखेरीस चिकन आणि अंड्याच्या भावात 25 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु जास्त खर्चामुळे चांगले उत्पन्न मिळवू शकणार नाही यामुळे शेतकरी निराश आहे. श्रावण महिन्यातही किंमतीत कोणतीही घट झालेली नाही. प्रति शेकडा अंड्याचा दर 400 ते 500 रुपये दर आहे. (Egg prices may rise in the next 10 days, know the reason)

या कारणामुळे किंमती वाढण्याची शक्यता

– घाऊक बाजारात चिकनची किंमतही 100 रुपये प्रती किलो आहे. कोंबड्यांना पोसण्यासाठी लागणाऱ्या धान्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.

– सध्याचे बाजार पाहता, तज्ज्ञ म्हणतात की यावेळी चिकन आणि अंड्यांचा पुरवठा मागणीपेक्षा 20 टक्के कमी आहे. या महिन्याच्या अखेरीस पुरवठ्यात 30 टक्के वाढ होऊ शकते.

– उत्तर प्रदेश पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष नबाब अली अकबर यांनी टीव्ही 9 ला सांगितले की, केंद्र सरकारच्या घोषणेनंतरही सोयामील येण्यास एक ते दीड महिना लागेल.

– दरम्यान, धान्याच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या किमतीत तीन पटींनी जास्त वाढ झाली असून ती 3500 ते 10000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. आता याची किंमतीवरच शेतकऱ्याचे उत्पन्न अवलंबून असेल.

– अली अकबर म्हणतात की वाढती मागणी पाहून डझनभर शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये कुक्कुटपालन सुरू केले आहे.

– नवीन कोंबडी अंडी तर देईल, पण त्यांचे वजन कमी असल्याने शेतकऱ्यांना त्यांची योग्य किंमत मिळू शकणार नाही. खरी किंमत दोन महिन्यांनंतरच उपलब्ध होईल.

– कोंबडीला दररोज 210 ग्रॅम धान्य द्यावे लागते. नवीन शेतकरी सुरुवातीला बाहेरून धान्य आणतात, जे कोंबड्यांसाठी जास्त धोकादायक असते, परिणामी, अंड्यांची संख्याही कमी होते. आता मक्याचे भावही वाढून 1800 रुपये प्रति क्विंटल झाले आहे म्हणजेच खर्च पालनाचा खर्च कुठेही कमी होणार नाही. (Egg prices may rise in the next 10 days, know the reason)

इतर बातम्या

पत्नीला सिगरेटचे चटके, अघोरी प्रयोगाने छळ, अखेर पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

ई-सेवा केंद्र, रेशनकार्डवरुन भाजप आक्रमक, मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरु, तीन आमदारांचा इशारा

Follow Us
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.