AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी वांग्यांची शेती, लाखो रुपयांचं उत्पन्न, नियोजन करा आणि पैसे कमवा

दूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही. यासाठी भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस, अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात.

यशस्वी वांग्यांची शेती, लाखो रुपयांचं उत्पन्न, नियोजन करा आणि पैसे कमवा
वांग्याची लागवडImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2023 | 10:52 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : जिल्ह्यात सातत्याने होणारा अवकाळी पाऊस (unseasonal rain) आणि चक्रीवादळ मुळे शेतकऱ्यांच्या (farmer) प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या सर्व संकटांवर मात देत नंदुरबार तालुक्यातील विजय माळी या शेतकऱ्यांनी वांग्यांची यशस्वी शेती करून दाखवली आहे. लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. त्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे त्यांचं इतर शेतकऱ्यांनी कौतुक केलं आहे. शेतीमध्ये योग्य पाण्याच्या, खताचा नियोजन आणि मेहनत केली की सर्व शक्य असतं, याचं उत्तम उदाहरण नंदुरबार शहरातील माळीवाडा येथे राहणाऱ्या विजय माळी हे आहेत. या विजय माळी यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर मेघना या वांग्यांच्या वाणाची लागवड (cultivation) केली होती, यासाठी त्यांनी एक लाख तीस हजार रुपये खर्च करून आतापर्यंत अडीच लाखांपर्यंचे उत्पन्न घेतले असून, अजून एका लाखाचे वांगे विकण्याची शक्यता आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही. यासाठी भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस, अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. परंतु भाजीपाल्याची शेतीसाठी योग्य पाण्याच्या आणि वेळेवर खतांची फवारणी केल्याने याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होत असतो. नंदुरबार बाजारपेठेत वांग्याला १२ ते १५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत आहे. तर बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीच्या खर्च देखील लागत असल्याने शेतकऱ्यांना याच्या मोठा फायदा होत आहे.

शेती परवडत नाही असे अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. परंतु योग्य नियोजन राहिलं, तर भाजीपाल्यांच्या शेतीतून लाखो रुपयांच्या याच्यात नफा देखील येऊ शकतो, विजय माळी या शेतकऱ्यांसारखे अनेक शेतकऱ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने शेती केली, तर कधीही शेतकरी उपाशी राहणार नाही. सध्या शेतकरी खरीपपूर्व मशागत करीत आहे, काही शेतकऱ्यांनी सगळी काम उरकली असून पावसाची वाट पाहत आहेत.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.