AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM kisan Yojna : शेतकऱ्यांना दिलासा, e-KYC बाबत सरकारचा मोठा निर्णय..!

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत सातत्याने बदल होत आहेत. योजनेत अनियमितता आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत मिळावी यासाठी सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. 1 जानेवारी रोजी या योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. यानंतरच्या म्हणजेच 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता 31 मार्च ही अखेरची मुदत होती. मात्र, स्थानिक पातळीवरच्या अडचणी आणि शेतकऱ्यांना पुरेसा वेळा मिळावा या उद्देशाने नियमात बदल करण्यात आला आहे.

PM kisan Yojna : शेतकऱ्यांना दिलासा, e-KYC बाबत सरकारचा मोठा निर्णय..!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
| Updated on: Mar 26, 2022 | 9:38 AM
Share

मुंबई : केंद्र सरकारच्या (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेत सातत्याने बदल होत आहेत. योजनेत अनियमितता आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत (Central Government) सरकारची मदत मिळावी यासाठी सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. 1 जानेवारी रोजी या योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. यानंतरच्या म्हणजेच 11 व्या हप्त्यासाठी (Farmer) शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता 31 मार्च ही अखेरची मुदत होती. मात्र, स्थानिक पातळीवरच्या अडचणी आणि शेतकऱ्यांना पुरेसा वेळा मिळावा या उद्देशाने नियमात बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना e-KYC हे अनिवार्य राहणार आहे पण यासाठी आता 31 मे पर्यंतची मुदत असणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ तर मिळणार आहे पण योजनेत नियमितता आणण्यासाठी प्रशासनाकडूनही योग्य ती यंत्रणा राबवली जाणार आहे.

गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा

पीएम किसान योजनेचा आता 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. वर्षाकाठी 6 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. योजनेचे हे 6 वे वर्ष आहे. मात्र, दरम्यानच्या काळात अपात्र नागरिकांनीही याचा लाभ घेतला आहे. शासकीय कर्मचारी, आयकर अदा करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही असे असताना लाखो नागरिकांना लाभ घेतला आहे. आता अशा नागरिकांकडून वसुली केली जात आहे. याची जबाबदारी ही महसूल आणि कृषी विभागावर असली तरी प्रत्यक्षात अजूनही या कामाला सुरवात झाली नाही.

शेतकऱ्यांकडे आता 2 महिन्याचा कालावधी

जानेवारीमध्ये 10 हप्ता जमा झाल्यानंतरच e-KYC हे बंधनकारक राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. एवढेच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी e-KYC केले नाही अशा शेतकऱ्यांची नावे ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्यानुसार आधार कार्ड, बॅंक पासबुक, मोबाईल नं.याची पूर्तता करुन शेतकऱ्यांना e-KYC करता येणार आहे.

ई-केवायसी करण्याची प्रक्रिया..

1. ई-केवायसी साठी प्रथम योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.तिथे तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. 2.तिथे तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. 3.यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी बटणवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर OTP पुन्हा येईल जो 6 अंकांचा असेल. ते भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

संबंधित बातम्या :

Cotton Rate | अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी भाव, कापसाला मिळाला 12 हजार रुपये Rate

बैलगाडा शर्यतीच्या परवानगीमुळे संस्कृतीचे जतन अन् ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटीही

Lemon Production: मागणी वाढली अन् उत्पादन घटलं, नैसर्गिक संकटाने सर्वकाही हिरावलं

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....