AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट, लाभार्थी शेतकरी मयत झाल्यास वारसांना लाभ मिळणार?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी वितरीत करण्यात आले. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही रक्कम वितरीत करण्यात आली. त्याचवेळी लाभार्थी शेतकरी मयत झाल्यास त्याच्या वारसांना लाभ मिळतो का, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट, लाभार्थी शेतकरी मयत झाल्यास वारसांना लाभ मिळणार?
शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेटImage Credit source: आयस्टॉक
| Updated on: Aug 09, 2026 | 3:55 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी शेतकरी कर्जमाफी योजनेत वितरीत करण्यात आले. आता पुढील टप्प्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. अनेक तांत्रिक आणि कागदपत्रातील त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी योजनेचाल लाभ मिळण्यास उशीर होऊ शकतो. हेअरकटचा मुद्दा सुटला आहे. पण एक अडचण समोर आली आहे. पीक कर्ज घेतलेल्या काही शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बसतात. पण ते आज हयात नाहीत. त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळेल का?

वारस नोंद केल्यास कर्जमाफीचा फायदा

कर्जमफीच्या निकषात बसणारे पण मयत शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मयत शेतकऱ्याच्या वारसदाराचे नाव महसुली दप्तरी नोंद करावी. नंतर त्याची पूर्तता सेवा संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेत करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंबंधीच्या काही तक्रारी असतील तर शेतकऱ्यांना तालुक्यातील सहाय्यक निंबधक, सहकार खाते यांच्याकडे संपर्क साधता येईल.

कर्जमुक्ती दोन टप्प्यात

पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 7 ऑगस्ट रोजी रक्कम वितरीत करण्यात आली. 5,029 कोटी रुपये, राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. ही पीक कर्ज खाती आता निरंक झाली आहेत. कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यात होणार नाही तर ती दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचे पैसे देण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

आधार प्रमाणिकरण महत्त्वाचे

कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागेल. त्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही . ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची आणि प्रोत्साहन पर रक्कम जमा होईल. शेतकऱ्यांची कर्जखाती नील होईल. त्यांना नव्याने पीक कर्ज घेता येईल. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. त्यात प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

Follow Us
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर