AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जिल्ह्यात मिरची लागवड अधिक होणार, शेतकरी लागले मशागतीच्या कामाला…

या वर्षीच्या खरीप हंगामात मिरचीच्या क्षेत्रात प्रचंड अशी वाढ होणार असून शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. नर्सरीतून तयार मिरचीचे रोप आणून लागवड सुरू झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र वाढणार आहे.

या जिल्ह्यात मिरची लागवड अधिक होणार,  शेतकरी लागले मशागतीच्या कामाला...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 30, 2023 | 8:56 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक (Chilli growers) जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी बाजारपेठेत ओल्या, लाल मिरचीला चांगला दर मिळाल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचा (Farmer) मिरची लागवडीकडे कल वाढला आहे. यावर्षी जिल्ह्यात मिरचीच्या क्षेत्रात फोन हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात मिरची लागवडीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पपई तर काही ठिकाणी कापसाला पर्याय म्हणून मिरची लागवडीकडे कल वाढवला आहे.

या वर्षीच्या खरीप हंगामात मिरचीच्या क्षेत्रात प्रचंड अशी वाढ होणार असून शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. नर्सरीतून तयार मिरचीचे रोप आणून लागवड सुरू झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र त्याचसोबत लागवड खर्चात ही वाढ होणार आहे. नर्सरीतून मिरचीच्या एक रोप 1.25 ते 1.50 पैश्याना मिळत असून, मिरची एकरी एक लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून एकरी दोनशे ते अडीचशे क्विंटल उत्पादन येत असतो. खर्च आणि मजुरी काढून चांगला नफा प्राप्त होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर मागील वर्षाप्रमाणे बाजारात तेजी राहिल्यास अजून नफ्यात वाढ होईल असा अंदाज मोहन पाटील, शेतकरी यांनी व्यक्त केला आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात पाऊस झाल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी सरकारच्या मदतीची वाट पाहत असून अद्याप मदत मिळाली नसल्याचं शेतकरी सांगत आहे. देशात अनेक राज्यात हवामानात बदल झाल्यामुळे पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात केळी बागा, त्याचबरोबर द्राक्षांच्या बागा, आंब्याच्या बागा अवकाळी पावसामुळे खराब झाल्या आहेत.

Follow Us
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल