AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Insurance : ‘बीड पॅटर्न’ला शेतकऱ्यांची पसंती, 4 दिवसांमध्ये 40 हजार शेतकऱ्यांचे अर्ज

'बीड पॅटर्न' मुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे. कारण यासाठी आता शासकीय विमा कंपनीच विमा काढणार आहे. यापूर्वी राज्यात वेगवेगळ्या 10 खासगी विमा कंपन्या कार्यरत होत्या. शिवाय त्या केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली काम करीत होत्या. कृषी विभागाने किंवा राज्य कृषिमंत्रि यांनी केलेला हस्तक्षेप देखाील या कंपन्यांना मान्य नव्हता.

Crop Insurance : 'बीड पॅटर्न'ला शेतकऱ्यांची पसंती, 4 दिवसांमध्ये 40 हजार शेतकऱ्यांचे अर्ज
पीक विमा
| Updated on: Jul 07, 2022 | 2:48 PM
Share

लातूर : (State Government) राज्य सरकराने घेतलेला एक निर्णयामुळे पीक विमा योजनेचे स्वरुप बदलले आहे. आता राज्यात (Beed Pattern) ‘बीड पॅटर्न’ (Crop Insurance) पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्याच्या या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यांनीही केले असल्याचे पाहवयास मिळत आहे. कारण 1 जुलै रोजी सुरु झालेल्या या योजनेत पहिल्या 4 दिवसांमध्येच 40 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यापूर्वी मुदत संपत येत असताना शेतकऱ्यांचा कल वाढायचा यंदा सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास सुरवात केली आहे. ग्राहक सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत असून शेतकऱ्यांनीही हा केलेला बदल स्वीकारले असल्याचे चित्र आहे. शिवाय योजनेत बदल करुनही कोणत्याही अडचणीशिवाय योजनेला सुरवात झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. शेतकऱ्यांचा असाच प्रतिसाद राहिला तर सहभागी शेतकऱ्यांची संख्याही यंदा वाढणार आहे.

बीड पॅटर्नमुळे नेमका फायदा काय ?

‘बीड पॅटर्न’ मुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे. कारण यासाठी आता शासकीय विमा कंपनीच विमा काढणार आहे. यापूर्वी राज्यात वेगवेगळ्या 10 खासगी विमा कंपन्या कार्यरत होत्या. शिवाय त्या केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली काम करीत होत्या. कृषी विभागाने किंवा राज्य कृषिमंत्रि यांनी केलेला हस्तक्षेप देखाील या कंपन्यांना मान्य नव्हता. बीड पॅटर्नमध्ये विमा हप्त्याचे दायित्व हे 80:110 असे असणार आहे.विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई 110 टक्के पेक्षा अधिक असेल तर वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ही 80 टक्के पेक्षा कमी असेल तर कंपनीला खर्चापोटी 20 टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेणार होते.

31 जुलै मुदत, अशा साधावा संपर्क

यंदाच्या खरिपातील पिकांचा विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. शिवाय शेतकऱ्यांनी सुरवात होताच चांगला प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांना माहिती करुन घेण्यासाठी जिल्हा बॅंकेची शाखा, राष्ट्रीयकृत बॅंक, विविध कार्यकारी सेवा सोसायटी तसेच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी एवढेच नाही तर सीएससी केंद्रावरुन माहिती घेणे गरजेचे आहे. शिवाय स्थानिक पातळीवर अडचणी आल्यास सीएससी केंद्रावरुन देखील माहिती घेता येणार आहे.

विमा हप्त्याची रक्कम कुठे भरायची

शेतकऱ्यांनी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरु शकतात. यासाठी सातबारा उतारा, आधार कार्ड, 8 अ, बॅंक पासबुक झेरॉक्स, पीक पेरणीची नोंद ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांचा भर सोयाबीन, कापसावर

सोयाबीन खरिपातील मुख्य पीक आहे. तर गतवर्षी विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा कापसालाही काही प्रमाणात पसंती दिली आहे. सध्या अधिकतर सोयाबीन, कापूस, धान पीक, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर आणि मका या पिकांचा विमा काढण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...