AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojna : 11 वा हप्ता वेळेत होणार जमा, योजनेच्या लाभासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरु

सध्या शेतशिवारात रब्बी हंगामाची लगबग सुरु असली तरी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याचेही वेध लागलेले आहेत. यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने या योजनेचा 10 हप्ता 10 कोटी 99 लाख 68 हजार 686 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. असे असले तरी या हप्त्याला 1 महिन्याचा उशिर झाला होता. पण 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अधिकची वाट पहावी लागणार नाही. कारण 11 वा हप्ता जमा करण्याची तयारी सुरु झाली आहे.

PM Kisan Yojna : 11 वा हप्ता वेळेत होणार जमा, योजनेच्या लाभासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरु
पीएम किसान योजना
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 07, 2022 | 3:32 PM
Share

मुंबई : सध्या शेतशिवारात रब्बी हंगामाची लगबग सुरु असली तरी शेतकऱ्यांना (PM Kisan Yojna) पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याचेही वेध लागलेले आहेत. यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी (Central Government) केंद्र सरकारने या योजनेचा 10 हप्ता 10 कोटी 99 लाख 68 हजार 686 (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. असे असले तरी या हप्त्याला 1 महिन्याचा उशिर झाला होता. पण 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अधिकची वाट पहावी लागणार नाही. कारण 11 वा हप्ता जमा करण्याची तयारी सुरु झाली आहे. सध्या पीक काढणीची गडबड आणि आगामी खरिपात शेतकऱ्यांची गरज ओळखून 15 एप्रिलपर्यंत या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. याकरिता 20 हजार कोटी खात्यावर वर्ग केले जाणार आहेत तर योजनेचा आतापर्यंतचा खर्च हा 2 लाख कोटींच्या घऱात जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खत्यात थेट पैसे जमा करणारी ही पहिलीच योजना आहे. शिवाय कोणता मध्यस्ती नाही, कोणते कमिशन नाही अशा पध्दतीने ही योजना देशात सुरु आहे. अन्यथा यापूर्वी भ्रष्ट नेते आणि शासकीय कर्मचारी हेच योजनेची वाट लावत होते. यावर आता अंकूश आला असून अत्यंत अल्पभुधारक शेतकऱ्यास देखील योजनेचा लाभ मिळत आहे.

नव्याने होता येणार योजनेमध्ये सहभागी

अनेक शेतकरी हे विविध कारणांमुळे अद्यापही योजनेपासून दूर आहेत. तर बोगस असे योजनेचा लाभ घेत आहेत. याची पडताळणीचे काम सुरु असून ज्यांनी पात्रता नसतानाही लाभ घेतलेला आहे अशांना पहिल्या हप्त्यापासून ही रक्कम केंद्र सरकारला परत करावी लागणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा महसूलच्या कर्मचाऱ्यांकडे ही रक्कम द्यावी लागणार आहे. जर कुणाला नव्याने सहभाग नोंदवायचा असेल तर मात्र, महसूल विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये अर्ज करताना बँक खाते,आधार आणि महसूल नोंदी व्यवस्थित भरा. एकाच लागवडीयोग्य जमिनीच्या नोंदीत एकापेक्षा जास्त प्रौढ सभासदांची नावे नोंदवल्यास या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रौढ व्यक्ती स्वतंत्रपणे लाभासाठी पात्र ठरणार आहे. काही अडचण आल्यास शेतकऱ्यांना(155261 किंवा 011-24300606) या हेल्पलाइनवर क्रमांकावर संपर्क साधता येईल.

e-KYC ची मुदत वाढल्याने दिलासा

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना e-KYC हे करावे लागणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्य़ंतची मुदत देण्यात आली होती. पण शेतकऱ्यांचा प्रतिसादच नव्हता. त्यामुळे e-KYC केल्याशिवाय 11 हप्ता मिळणार नाही असे धोरण ठरविवण्यात आले होते. पण आता यामध्ये वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना 22 मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पीएम किसान योजना अनौपचारिकपणे 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती.आता या योजनेचा 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे.

संंबंधित बातम्या :

Latur Market: हमीभावाप्रमाणेच बाजारपेठेत तुरीचे दर, सरकारच्या निर्णयाचा परिणाम काय ? सोयाबीनचं मात्र शेतकऱ्यांनी मनावर घेतलं

Fertilizer Rate : ज्याची भीती शेतकऱ्यांना तेच घडलं, डीएपी खत दीडशे रुपयांनी महागलं

Yellow Watermelon : जे जे नवं ते बारामतीकरांना हवं, पिवळे कलिंगड पाहून काय म्हणाले मंत्री जयंत पाटील?

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.