AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar : वर्षभरानंतर ‘एफआरपी’ प्रश्न मार्गी, शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे साखर सहसंचालकाचे कारखान्याला आदेश

2020 -21 मधील श्रीगोंदा सहकारी कारखानाच्या गाळप हंगाम एफआरपीची शिल्लक रक्कम बाकी होती. प्रति टन 2 हजार 661 रुपयांपैकी 2 हजार 444 रुपये शेतकर्‍यांना ऑक्टोबर 2021 पर्यंत दिले होते. शिल्लक राहिलेले प्रती टन 217 रूपये कोणत्या कारणाने शेतकर्‍यांना दिले नाहीत यासाठी ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी माहिती अधिकारात पाठुपरावा केला. शेतकऱ्यांवर उघडच अन्याय होत असल्याचे निदर्शनास येताच पैसे देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Ahmednagar : वर्षभरानंतर 'एफआरपी' प्रश्न मार्गी, शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे साखर सहसंचालकाचे कारखान्याला आदेश
साखर सहसंचालक मिलिंद भालेरावImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 2:52 PM
Share

अहमदनगर :  (Sugarcane Sludge) ऊस गाळपाला लागूनच शब्द येतो तो म्हणजे एफआरपी रक्कम. (FRP) एफआरपीबाबत काही साखर कारखाने हे चोख भूमिका घेतात तर काहींकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेचा प्रश्न अखेर वर्षभराने मार्गी लागला आहे. सन 2020-21 मधील एफआरपी रक्कम ही नागवडे सहकारी (Sugar Factory) साखर कारखान्याकडे होती. या रकमेतील 63 लाख 79 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचे आदेश नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने सुनावणी दरम्यान दिले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

गतवर्षीच्या गाळप हंगामातील रक्कम होती बाकी

2020 -21 मधील श्रीगोंदा सहकारी कारखानाच्या गाळप हंगाम एफआरपीची शिल्लक रक्कम बाकी होती. प्रति टन 2 हजार 661 रुपयांपैकी 2 हजार 444 रुपये शेतकर्‍यांना ऑक्टोबर 2021 पर्यंत दिले होते. शिल्लक राहिलेले प्रती टन 217 रूपये कोणत्या कारणाने शेतकर्‍यांना दिले नाहीत यासाठी ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी माहिती अधिकारात पाठुपरावा केला. शेतकऱ्यांवर उघडच अन्याय होत असल्याचे निदर्शनास येताच पैसे देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने केलेल्या सुनावणीचा परिणाम इतरत्रही होऊ शकतो.

63 लाख 79 हजार शेतकऱ्यांच्या हक्काचे

शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे शेतकऱ्यांना मिळायलाच हवे यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.साख आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापर्यंत पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रती टन 217 रुपये शेतकर्‍यांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर प्रादेशिक सह संचालकांनी कारखान्यास पत्र पाठवून 4 मे 2022 रोजी सुनावणी घेतली. यात बाकी राहिलेले 217 रुपयांपैकी प्रतिटन 9.08 रुपये शेतकर्‍यांना देण्याचा आदेश कारखान्यास दिला आहे. यामुळे एकूण बाकी 25 कोटी 37 लाख 46 हजार पैकी 63 लाख 79 हजार शेतकर्‍यांना मिळणार आहेत.

11 कारखान्यांची धुराडी बंद, 12 सुरु

जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांपैकी 11 कारखाने बंद झाले असून 12 कारखाने सुरु आहेत. तसेच यंदाच्या हंगामात आतापर्यंत 1 कोटी 80 लाख मेट्रिक टन गाळप केलीये. तर 4 लाख 21 हजार मेट्रिक टन गाळप शिल्लक असून श्रीरामपूर तालुक्यात सर्वात जास्त शिल्लक आहेय. त्यामुळे या तालुक्यात हार्वेस्टिंगची संख्या वाढवली आहे. तसेच सध्या पावसाळा जवळ आल्याने ऊसतोड कामगार आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या ऊस तोडणीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहेय. त्यामुळे हार्वेस्टिंग वरच ऊस तोडणी अवलंबून आहेय. तर श्रीरामपूर मध्ये 40 हार्वेस्टर वाढवले असून जोपर्यंत उजळ पूर्ण होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू ठेवावे अशा आदेश साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.