AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goat Bank: महाराष्ट्रातील अनोखी बँक; ग्रामीण महिलांना कर्जावर दिल्या जातात शेळ्या; तर व्याज म्हणून द्यावी लागते ही गोष्ट, तुमचाही विश्वास नाही बसणार

Maharashtra Goat Bank: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना कर्जावर शेळी देण्यात येते. ही अनोखी कल्पना ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण यातून काही स्टार्टअप्स आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. काय आहे ही बँक? कशी करते ती काम?

Goat Bank: महाराष्ट्रातील अनोखी बँक; ग्रामीण महिलांना कर्जावर दिल्या जातात शेळ्या; तर व्याज म्हणून द्यावी लागते ही गोष्ट, तुमचाही विश्वास नाही बसणार
महाराष्ट्र बकरी बँकImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 15, 2026 | 3:20 PM
Share

Seva Sahayog Foundation Jalgaon: आर्थिक बँकाविषयी, पतसंस्थांविषयी तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्ही शेळी, बकरी बँकेविषयी ऐकले आहे का? राज्यातील काही भागात या बँकेचे प्रयोग सुरू आहे. या बँकेत कर्जावर शेळी देण्यात येते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हा प्रयोग सुरू आहे. या बँकेत पैशांची देवाण-घेवाण होत नाही तर शेळ्यांची आणि करडू देवाण-घेवाण करण्यात येते. या अनोखी बँकेची राज्यातच नाही तर देशातही मोठी चर्चा सुरू आहे. काय आहे ही बँक आणि कशी करते ती काम?

कर्जावर मिळते बकरी

राज्यातील जळगाव जिल्ह्यात कर्जावर बकरी देणारी बँक आहे. चाळीसगाव तालुक्यात ही बँक कार्यरत आहे. ही अनोखी बँक ग्रामीण भागातील हजारो महिलांना मोठी आर्थिक मदत करत आहे. ते पण कोणाताही पैसा न घेता. Goat Bank म्हणून ही बँक ओळखली जाते. या बँकेत कर्जावर शेळी उपलब्ध करून देण्यात येते. या बँकेत रोखीत व्यवहार होत नाही. तर बकऱ्यांचीच देवाण-घेवाण करण्यात येते. म्हणजे या बँकेतून ग्रामीण भागातील महिलांनी जर शेळी नेली तर त्या बदल्यात शेळीचे पिल्लू, करडू द्यावे लागते.

कोण चालवते ही बँक?

ही बकरी बँक, शेळी बँक पुण्यातील सेवा सहयोग फाऊंडेशन चालवते. गरीब, विधवा, परितक्त्या, एकट्या, जमीन नसलेल्या महिलांना ही बँक मदत करते. ज्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध होत नाही. त्यांना ही बँक कर्जावर शेळी उपलब्ध करून देते. या स्वयंचळवळीने राज्यातील 300 हून अधिक महिला आत्मनिर्भर झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

महिलांना देण्यात येते प्रशिक्षण

बकरी बँकेकडून महिलांना केवळ बकरी, शेळीचेच वाटप होते असे नाही. तर त्यांना पशुपालन आणि बकरी पालनाचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीला एक गर्भधारणा केलेली बकरी देण्यात येते. पण या बँकेची एक अट आहे. त्यानुसार, शेळी दिल्यानंतर सहा ते नऊ महिन्यानंतर जेव्हा बकरी करडू जन्माला घालते. तेव्हा हे करडू या बँकेला ठेव म्हणून परत द्यावे लागते.

सेवा सहयोग फाऊंडेशनुसार एक बकरी साधारणपणे एका वर्षात तीन ते चार पिल्लं जन्माला घालते. एक पिल्लू बँकेला परत केल्यावर महिला इतर पिल्लांना विकू शकते. वा त्याचे पालनपोषण करून दूध विक्री करू शकते. या प्रक्रियेत महिलांना वार्षिक 30,000 रुपयांपर्यंत कमाई होते. ग्रामीण भागात रोजगाराचं हे एक चांगलं माध्यम असल्याचे दिसून येते. महिला सशक्तीकरणाचे हे मॉडेल सध्या देशभरात चर्चेत आहेत.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.