AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी वाऱ्यासह पावसाने या जिल्ह्यात मोठं नुकसान, शेतातील रब्बी ज्वारी पिकासह इतर पिके जमीनदोस्त

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसत आहे. पिके जमीनदोस्त होत आहेत.

वादळी वाऱ्यासह पावसाने या जिल्ह्यात मोठं नुकसान, शेतातील रब्बी ज्वारी पिकासह इतर पिके जमीनदोस्त
| Edited By: | Updated on: Mar 07, 2023 | 3:30 PM
Share

बुलढाणा : गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसत आहे. पिके जमीनदोस्त होत आहेत. रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील आत्माराम कापरे यांच्या अडीच एकरातील ज्वारीचे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले. या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

गहू, हरभरा जमीनदोस्त

रात्री पडलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर, वरवट बकाल, सोनाळा, लाडनापुर या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके जमीनदोस्त झालीत. झाडांची संत्री जमीनीवर पडली आहेत. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वादळी वाऱ्याने गहू भूसपाट झाला आहे. संत्रा गळून पडला आहे. झाडाखाली संत्र्याचा सडा पाहायला मिळतो. खाली पडल्यामुळे असा संत्रा लवकर खराब होतो. या नुकसानीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. गहू, हरभरा तसेच ज्वारीचे पीकही जमीनदोस्त झाले आहे. हिरवेगार ज्वारीचे दांडे खाली झोपल्यागत दिसत आहेत. शेकडो एकर शेतातील पिकावर या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

पिकासह संत्रा बागेचे मोठे नुकसान

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच अतोनात नुकसान झाले. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.