AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिले अंदाजेच : वापर कमी अन् बिले अवास्तव, काय आहे बांधावरचे वास्तव?

ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर ही वसुली केली जात आहे. मात्र, वास्तवतेचे भान ठेऊन ही कारवाई केली जात नसल्याचा आरोप आता शेतकऱ्यांमधूनच होऊ लागला आहे. कारण विजबीलाची प्रत तर शेतकऱ्यांना पोहचती केली जात नाहीच शिवाय अंदाजेच रक्कम थकबाकीत दाखवून वसुली केली जात आहे.

वीजबिले अंदाजेच : वापर कमी अन् बिले अवास्तव, काय आहे बांधावरचे वास्तव?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 1:25 PM
Share

लातूर : सध्या (MSEDCL) महावितरणकडून अधिकच्या थकबाकी म्हणून विजतोडणीची मोहिम संबंध राज्यात सुरु आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर ही (Electricity Bill Collection) वसुली केली जात आहे. मात्र, वास्तवतेचे भान ठेऊन ही कारवाई केली जात नसल्याचा आरोप आता शेतकऱ्यांमधूनच होऊ लागला आहे. कारण वीजबीलाची प्रत तर शेतकऱ्यांना पोहचती केली जात नाहीच शिवाय अंदाजेच रक्कम थकबाकीत दाखवून वसुली केली जात आहे. त्यामुळे अवास्तव बिल शेतकऱ्यांकडून वसुल केले जात आहे. लातूर, अकोला येथील शेतकऱ्यांनी हा आरोप केला आहे.

सर्वाधिक थकबाकी ही कृषीपंपाकडे असल्याचे महावितरणचे म्हणने आहे. शेतकरी वेळेत बील अदा करीत नाहीत. शिवाय पिकांच्या भरण्यादरम्यान अधिकचा वापर केला जात आहे. मात्र, थकबाकीचा आकडा हा 75 हजार कोंटींवर गेला असल्याने आता कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहीमच राज्यात सुरु झाली आहे. लातूर जिल्ह्यात मांजरा पट्ट्यालगतचा विद्युत पुरवठा हा खंडीत करण्यात आला आहे.

रब्बी हंगामातच अधिकचा वापर तरीही

रब्बी हंगामातीलच पिके जोपासण्यासाठी कृषीपंपाचा वापर शेतकरी करतात. खरीप हंगामातील पिके तर पावसाच्या पाण्यावरच असतात. शिवाय गेल्या दोन वर्षापासून समाधानकारक पाऊस झाल्याने विजेचा वापर कमी झाला आहे. केवळ नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यानच कृषीपंप हे सुरु केले जातात. असे असतनाही बाराही महिन्यांच्या बिलांची सरासरी एकच धरुन अंदाजेच बिले अदा केली जात असल्याचा आरोप शेतकरी नवनाथ जगताप शिंदे यांनी केला आहे. शिवाय महावितरणकडून कसलेही विजबिल हे दिले जात नाही. लाईनमनच अंदाजित बिलाची मागणी करीत असतात. ऐन रब्बी हंगामात दरवर्षी शेतकऱ्यांना अडचणीत पकडून विजबिल वसुली केली जात आहे.

रोहित्राची दुरुस्ताही शेतकऱ्यांकडूनच

रब्बी हंगामाच्या भरण्यादरम्यान अधिकचा विजेचा वापर होत असल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही महावितरणची असते मात्र, पार पाडावी लागते ती शेतकऱ्यांना. कारण वेळेत रोहित्र न मिळाल्यास पिकांना धोका निर्माण होतो. पण दुरुस्तीचे पैसे पुन्हा विजबिलातून कट केले जातील असे तोंडी सांगितले जाते पण प्रत्यक्षात काहीच कारवाई होत नाही, त्यामुळे महावितरणाच्या कारभाराने शेतकरी त्रस्त आहेत. ऐन रब्बी हंगामात लातूर तालुक्यातील गाधवड, तांदूळजा तसेच मांजरा नदीलगतच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

विज पुरवठ्यातही अनियमितता

हंगाम सुरु होण्यापूर्वी कृषीपंपासाठी 10 तास विद्युत पुरवठा केला जात होता. मात्र, रब्बी हंगामातील पिकांची उगवण होताच यामध्ये बदल करुन 8 तास पुरवठा करण्याच आला आहे. यामध्येही रात्रीच्या वेळी विज देण्यात आल्याने शेतकऱ्यांना थंड़ीत शेताची वाट तुडवत भरणे उरकून घ्यावे लागत आहे. तर 8 तासही नियमित पुरवठा होत नाही. यामध्ये तांत्रिक बिघाड झाला तर केवळ 4 ते 5 तासच विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे महावितरण कंपनीने सक्तीची आणि अधिकची वसुली करु नये अशी मागणी नवनाथ शिंदे तसेच सर्व शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Video | भररस्त्यात रेड्यांची टक्कर ! मग काय बघ्यांची गर्दी अन् वाहतूकीचे तीन तेरा

खरीप-रब्बी बेभरवश्याचीच, आता शाश्वत शेतीसाठी ‘हाच’ शेतकऱ्यांकडे पर्याय…!

मागणी एकाची, मदत दुसऱ्यालाच, भूमिहीन नागरिकाच्या खात्यावर अतिवृष्टीचे 825 रुपये अनुदान, काय आहे नेमका प्रकार?

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.