AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane Sludge : हंगाम अंतिम टप्प्यात, यंदा साखरेचा गोडवा वाढला, 350 लाख टनाचा टप्पा गाठला

4 महिन्याचा गाळप हंगाम यंदा कधी नव्हे तो 7 महिने सुरु राहिला होता. उत्पादनाबरोबरच यंदा ऊसाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे हे परिणाम आहेत. शिवाय साखऱ कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुन देखील राज्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर हंगाम संपल्यात जमा असून देशात केवळ 29 साखर कारखाने हे सुरु आहेत.

Sugarcane Sludge : हंगाम अंतिम टप्प्यात, यंदा साखरेचा गोडवा वाढला, 350 लाख टनाचा टप्पा गाठला
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 13, 2022 | 6:12 AM
Share

पुणे : अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जेवढ्या अडचणी गाळप हंगामात आल्या आहेत त्याच पटीने (Sugar Production) साखर उत्पादनातून दिलासाही मिळाला आहे. यंदा विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात 522 साखर कारखान्याच्या माध्यमातून हंगाम पार पडला असून सर्वाधिक उत्पादन हे (Maharashtra) महाराष्ट्रातून झाले आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात देशात 350 लाख टनाचा टप्पा साखरेने पार केला होता. आतापर्यंत सर्वाधिक उत्पादन यंदा झाले आहे. गतवर्षी 307 लाख टन उत्पादन झाले होते. असे असले तरी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे तर दुसरीकडे साखर कारखानेही बंद झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त उसाचे काय होणार हा प्रश्न आहे.

29 साखर कारखाने सुरुच

4 महिन्याचा गाळप हंगाम यंदा कधी नव्हे तो 7 महिने सुरु राहिला होता. उत्पादनाबरोबरच यंदा ऊसाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे हे परिणाम आहेत. शिवाय साखऱ कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुन देखील राज्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर हंगाम संपल्यात जमा असून देशात केवळ 29 साखर कारखाने हे सुरु आहेत. यंदा 45 लाख टन अधिकचे साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे.

हंगामापूर्वीच घेतला जाणार ऊस तोडणीचा अंदाज

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न अजूनही कायम आहे. शिवाय यंदा सारखीच पुन्हा परस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 2022 च्या उत्तरार्धात उपग्रह प्रतिमांच्या आधारे पुढील वर्षी किती ऊस तोडणीसाठी असणार आहे. याबाबतचा अंदाज घेतला जाणार आहे. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच त्याचे नियोजन केले जाणार आहे. यंदा अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील वर्षी हीच वेळ येऊ नये म्हणून आतापासूनच नियोजन केले जाणार आहे.

सर्वाधिक गाळप अन् उत्पादन महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक ऊसाचे गाळप हे महाराष्ट्रात झाले आहे. असे असले तरी अतिरिक्त उसाचा प्रश्नही याच महाराष्ट्रात राहिलेला आहे. गेल्या तीन वर्षापासून अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस बरसत असल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. यंदा तर 7 महिने हंगाम सुरु राहिला आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.