AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : बहारों फुल बरसाओ… लग्नसराईनं फुलांचाही रुबाब वाढला, कोरोनानंतर प्रथमच सुगीचे दिवस

पीक बहरलं तरी वातावरण बदलाचा फटका आणि बाजारपेठेत दाखल केले तरी दरातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसयाचे गणितच बिघडत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन फुलांची लागवड केली तर कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे नुकसान ठरलेलेच. पण यंदा परस्थिती बदलत आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील झाले आहेत तर दुसरीकडे लग्नसराईमुळे फुलांच्या दरात वाढ होत आहे.

Nanded : बहारों फुल बरसाओ... लग्नसराईनं फुलांचाही रुबाब वाढला, कोरोनानंतर प्रथमच सुगीचे दिवस
लग्नसराईमुळे का होईना फुलांच्या दरात वाढ होत आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 10:41 AM
Share

नांदेड : पीक बहरलं तरी (Climate Change) वातावरण बदलाचा फटका आणि बाजारपेठेत दाखल केले तरी दरातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसयाचे गणितच बिघडत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन (Floricultural) फुलांची लागवड केली तर कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे नुकसान ठरलेलेच. पण यंदा परस्थिती बदलत आहे. (Corona) कोरोनाचे निर्बंध शिथील झाले आहेत तर दुसरीकडे लग्नसराईमुळे फुलांच्या दरात वाढ होत आहे. दोन वर्षानंतर यंदा परस्थिती बदलत आहे. मागणी आणि दर वाढत गेले तर गेल्या दोन वर्षातील नुकसान भरुन निघेल असा विश्वास फुल उत्पादक शेतकऱ्यांना आहे. नायगांव तालुक्यातील प्रताप वाघमारे यांनी 20 गुंठ्यामध्ये गलांडा जातीच्या फुलाची लागवड केली आहे. ऐन लग्नसराईमध्येच तोड होत असल्याने त्यांना वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. लग्नसराईमुळे का होईना दरात वाढ होत असून हेच फुल उत्पादकांसाठी दिलासादायक आहे.

20 गुंठ्यात फुलमळा, वाढीव उत्पन्नाची अपेक्षा

नायगांव तालुक्यातील गोळेगांव इथल्या प्रताप वाघमारे यांनी केवळ 20 गुंठ्यातच पण योग्य ते नियोजन करुन गलांडा जातीच्या फुलांची जोपसणा केली आहे. लागवड करीत असतानाच लग्नसराईत तोड होईल हाच उद्देश त्यांनी डोळ्यसमोर ठेवला होता. अखेर त्यांचा उद्देश साध्य होताना दिसत आहे. कारण कोरोनाचे निर्बंध हटल्याने लग्नही धुमधडाक्यात होऊ लागल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय उत्पादन क्षेत्र कमी असल्याने आणखीन दर वाढतील अशी अपेक्षा आहे.

कोरोना काळातील नुकसान भरुन काढणार

गेल्या दोन वर्षापासून फुलांचा बाजारच उठलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमच पार पडले नाहीत तर लग्नसमारंभात केवळ दोन हरालाच महत्व होते. त्यामुळे फुल उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा झालेले नुकसान भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. एकीकडे बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत तर दुसरीकडे उत्पादन क्षेत्रात घट. या दोन्हीचा फायदा ज्यांनी फुलांचे उत्पादन घेतले अशा शेतकऱ्यांना होणार आहे.

सध्या काय आहे बाजारपेठेतील स्थिती?

लग्नसराईच्या अनुशंगाने का होईना फुलांच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. गलांडा जातीच्या फुलाच्या किंमती ह्या 20 ते 25 रुपये किलो अशा होत्या. मात्र, आता दरात सुधारणा होत असल्याचे शेतकरी प्रताप वाघमारे यांनी सांगितले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच 40 रुपये किलोने मागणी सुरु आहे. भविष्यात आणखीन दरात वाढ होईल असा विश्वास त्यांना आहे.

संबंधित बातम्या :

Mango : ज्याची भीती तेच झाले, आंब्याची मागणी वाढली उत्पादन घटलं हे सर्व वातावरणातील बदलाने घडलं..!

Unseasonable Rain: द्राक्षानंतर कांदा नुकसानीने डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला! देवळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

Central Government : ‘ड्रोन’ शेतीला अखेर ग्रीन सिग्नल, काय असणार अटी-नियम? वाचा सविस्तर

माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.