AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर…

सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना ज्या वाढीव दराची अपेक्षा होती तोच दर आता बाजारपेठेत मिळत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस बाजारसमित्या बंद होत्या त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याची उत्सुकता शिघेला पोहचली होती. मात्र, सोयाबीनच्या दर वाढीतील सातत्य कायम असून आता सात हजाराकडे सोयाबीनची वाटचाल सुरु झाली आहे.

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर...
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.
| Updated on: Feb 21, 2022 | 1:34 PM
Share

लातूर : सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना ज्या वाढीव दराची अपेक्षा होती तोच दर आता बाजारपेठेत मिळत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस बाजारसमित्या बंद होत्या त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याची उत्सुकता शिघेला पोहचली होती. मात्र,  (Soybean Rate) सोयाबीनच्या दर वाढीतील सातत्य कायम असून आता सात हजाराकडे सोयाबीनची वाटचाल सुरु झाली आहे. आता पर्यंत 6 हजार 500 हा सर्वाधिक दर होता पण सोमवारी सोयाबीनला 6 हजार 750 एवढा दर मिळाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार हे निश्चित मानले जात आहे. (Kharif Season) हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी (Soybean Stock) सोयाबीन आणि कापूस साठवणूकीवर शेतकऱ्यांनी भर दिला होता. तोच निर्णय आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

15 दिवसांनंतर दरात झाला बदल

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर स्थिर झाल्यापासून आवकही वाढली होती. असे असले तरी गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीन हे 6 हजार 500 वर स्थिरावले होते. त्यामुळे यापुढे दरात वाढ होणार का घट ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. पण शेतकऱ्यांना खरा दिलासा सोयाबीनने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीमधील व्यवहार हे बंद होते. सोमावारी थेट 250 रुपायांची वाढ झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे.

शेतीमालाची आवक वाढली

शेतीमालाची आवक ही दरावरच अवलंबून असते. त्याच प्रमाणे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा वगळता तूर, सोयाबीन, उडदाला सरासरीप्रमाणे दर मिळत आहे. सोयाबीनचे दर स्थिरावल्यापासून आवकमध्ये वाढ होत आहे. सोमवारी लातूर बाजार समितीमध्ये 15 हजार पोत्यांची आवक झाली होती. तर दुसरीकडे हरभऱ्याची सर्वाधिक म्हणजे 22 हजार पोत्यांची आवक झाली तर खरीप हंगामातील शेवटचे पीक असणारे तूरीची आवकही वाढलेली आहे. खरीप हंगामात उत्पादनात घट झाली असली तरी सध्याच्या दरावर शेतकरी समाधानी आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

Summer Onion : वाढीव कांदा उत्पादनाचे करायचे काय? सरकारच्या धोरणावरच कांदा दराचे भवितव्य..!

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....