AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी या पिकाचा बाजारपेठेत तोरा कायम आहे. सरकीच्या दरातील चढ-उताराचा परिणाम कापसावरही होत असला तरी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे त्याचे सोनेच होणार असल्याचे संकेत कृषितज्ञ देत आहेत. या आठवड्यात सरकीच्या दरात वाढ होताच कापूसही वधारला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर हे 10 हजारवर स्थिरावले असले तरी भविष्यात कापसाला 13 हजार रुपये क्विंटलचा दर मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा 'तो' निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर
| Updated on: Feb 21, 2022 | 12:19 PM
Share

पुणे : कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी या पिकाचा बाजारपेठेत तोरा कायम आहे. सरकीच्या दरातील चढ-उताराचा परिणाम (Cotton Rate) कापसावरही होत असला तरी ज्या शेतकऱ्यांनी (Cotton Stock) कांद्याची साठवणूक केली आहे त्याचे सोनेच होणार असल्याचे संकेत कृषितज्ञ देत आहेत. या आठवड्यात सरकीच्या दरात वाढ होताच कापूसही वधारला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर हे 10 हजारवर स्थिरावले असले तरी भविष्यात कापसाला 13 हजार रुपये क्विंटलचा दर मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटी (Cotton Production) कापूस उत्पादन किती झाले याचा अंदाज येतो यावरुनच दर काय राहणार हे सांगता येते. पण घटत्या उत्पादनामुळे एप्रिलमध्ये कापसाला विक्रमी दर मिळेल असा अंदाज पणन महासंघाचे माजी व्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर

हंगामाच्या सुरवातीला कापसाच्या उत्पादनात घट होणार हे स्पष्ट असतानाही बाजारपेठेतील दर हे कमीच होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीपेक्षा साठवणूकीवरच अधिकचा भर दिलाच. जो निर्णय सोयाबीनबाबत तोच कापसाच्या पिकाबाबतही घेण्यात आला होता. वाढीव दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक. त्यामुळेच आज हंगामाच्या अंतिम टप्प्यात आणि भविष्यातही कापसाचे दर हे कायम राहणार आहेत. सध्या 10 हजारावर कापूस स्थिरावला असला तरी एप्रिलमध्ये दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘या’ कापसाला मिळतो वाढीव दर

सरसकट सर्वच कापसाला सारखाच दर असे बाजारपेठेतले चित्र नाही. कापसाच्या दर्जानुसार दर ठरले जातात.धाग्याची लांबी 29 मि.मी पेक्षा अधिक असणाऱ्या तसेच कापसाचा शुभ्रपणा 74 टक्केपेक्षा अधिक असल्यास चांगला दर मिळतो. कापसामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे 9 टक्केपेक्षा कमी असावे लागते तर कचऱ्याचे प्रमाण हे 3 टक्केपेक्षा कमी असल्यास अशा कापसाला चांगला दर मिळतो. त्यामुळे केवळ साठवणूकच महत्वाची नाही तर त्याची काळजी घेणेही गरजेचे आहे.

10 हजारावर कापूस स्थिरावला, मात्र भविष्यात..

गेल्या काही दिवसांपासून कापूस 10 हजारावर तर सोयाबीन हे 6 हजार 500 वर स्थिरावलेले आहे. या दोन्ही पिकांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. सध्या कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी या महिन्याच्या अखेरीसच कापसाच्या उत्पादनाबद्दल अधिकृत सांगता येणार आहे. मात्र, उत्पादन घटले हे निश्चित असून ज्या शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने कापसाची साठवणूक केली त्यांना वाढीव दर मिळणारच असा कृषितज्ञांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

Summer Onion : वाढीव कांदा उत्पादनाचे करायचे काय? सरकारच्या धोरणावरच कांदा दराचे भवितव्य..!

ज्याच्यावर सारा पैसा लावला, ते पिक घटलं, वरखर्च देणारा भाजीपालाही कवडीमोलाचा, सांगा शेती करायची कशी ?

Drone Farming : केंद्राचा निर्णय, राज्याची अंमलबजावणी, कृषी विद्यापीठांमध्ये काय आहेत हालचाली?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.