AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fruit Insurance : मुख्य फळपिकांना विमा कंपनीचा ठेंगा, सीताफळाला मात्र मंजुरी

पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या हीताच्या नाहीतर स्वता:च्या आर्थिक हीताचा निर्णय घेतात हे सातत्याने समोर आलेच आहे. पण नैसर्गिक संकटात असलेल्या फळ बागायतदार शेतकऱ्यांचा तरी सहानभूतीपुर्वक निर्णय घेणे गरजेचे असताना विमा कंपनीने जिल्ह्यात कमी क्षेत्रावर असलेल्या सीताफळाला विमा मंजूर केला आहे. मात्र, मोसंबी आणि डाळिंबाचे अधिकचे नुकसान होऊन देखील या फळपिकांना वगळण्यात आले आहे.

Fruit Insurance  : मुख्य फळपिकांना विमा कंपनीचा ठेंगा, सीताफळाला मात्र मंजुरी
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 21, 2022 | 5:00 AM
Share

जालना: पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या हीताच्या नाहीतर स्वता:च्या आर्थिक हीताचा निर्णय घेतात हे सातत्याने समोर आलेच आहे. पण नैसर्गिक संकटात असलेल्या (Fruit Orchardist) फळ बागायतदार शेतकऱ्यांचा तरी सहानभूतीपुर्वक निर्णय घेणे गरजेचे असताना (Crop Insurance Company) विमा कंपनीने जिल्ह्यात कमी क्षेत्रावर असलेल्या सीताफळाला विमा मंजूर केला आहे. मात्र, मोसंबी आणि डाळिंबाचे अधिकचे नुकसान होऊन देखील या फळपिकांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे (Kharif Season) खरीपानंतरही विमा कंपन्यांचा मनमानी कारभार हा सुरुच आहे. यामुळे खरीप हंगामात पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही आता फळ बागांबाबतही अशीच भूमिका निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यासाठी स्वतंत्र विमा योजनेची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षीच नियमात बदल होत असून शेतकरीही याबाबत अनभिज्ञ असतात.

विमा भरुनही शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत

गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरीही निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहे. त्यामुळे शेतकरी हे पीकविमा योजनेचे कवच घेत आहे. पण राज्यात विमा कंपन्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याने विमा रक्कम अदा करुनही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला हा मिळत नाही. हीच अवस्था जालना जिल्ह्यातील मोसंबी आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानावर आधारित एचडीएफसी कंपनीकडे विमा रक्कम अदा केली होती. मात्र, या दोन फळपिकांनाच योजनेचतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

सीताफळाचा समावेश असूनही अडचणी कायम

जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीचे अधिक क्षेत्र आहे. त्याचअनुशंगाने पैठण येथे ‘सीट्रस इस्टेट’ ची उभारणी केली जात आहे. असे असतानाही पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा मृग बहर योजनेतून मोसंबी आणि डाळिंब या पिकांना तर वगळण्यात आले आहेच पण सीताफळाचा यामध्ये समावेश करण्यात आला असला तरी मापात पाप करुन तोकडाच विमा दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने प्रथमच सीताफळासाठी विम्याचे कवच दिले होते पण विमा कंपन्यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला नाही.

हवामान बदलामुळे फळपिकांचे नुकसान

केवळ खरीप हंगामातील पिकांवरच वातावरण बदलाचा परिणाम झाला नाही तर फळबागांचेही नुकसान झाले होते. हाच धोका गेल्या काही वर्षांपासून कायम असल्या्ने जिल्ह्यातील फळ बागायत शेतकऱ्यांनी विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला शिवाय विमा रक्कमही अदा केली. असे असताना या मोसंबी आणि डाळिंब या मुख्य पिकांनाच डावलण्यात आले आहे. त्यामुळे विमा कंपनीने फेरविचार करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Latur: लातूरमध्ये 11 साखर कारखाने तरीही शेतकऱ्यांचा ऊस फडातच, नुकसानीला जबाबदार कोण?

शेतकरी उत्पादक कंपन्यामुळेच भारत बाजरी उत्पादनात जगाच्या केंद्रस्थानी, केंद्र सरकारचे कंपन्यांना पाठबळ

शेती उत्पादनवाढीसाठी ‘जीएम’ वाणांशिवाय पर्याय नाही, काय आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या?

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.