कांद्याच्या मुद्द्यावरून आंदोलनाची ठिणगी, सरकारने लवकर हस्तक्षेप करावा अन्यथा…

नाशिकच्या सुरगाणा येथे झालेल्या अधिवेशनात किसान सभेच्या वतिने कांद्याच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे. याशिवाय सत्तेच्या मुद्द्यावर टोलाही लगावला आहे.

कांद्याच्या मुद्द्यावरून आंदोलनाची ठिणगी, सरकारने लवकर हस्तक्षेप करावा अन्यथा...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 2:00 PM

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक : सत्तेचा खेळ थांबवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ( Farmer News ) दिलासा द्या नाहीतर तुमच्या घरासमोर कांदे ओतून ( Onion Protest ) आंदोलन करू असा इशाराच किसान सभेच्या वतिने देण्यात आला आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाविकास आघाडी कांद्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली असतांना आता किसान सभेच्या वतिनेही आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कांद्याचे दर हजार रुपयांच्या खाली घसरले असून दरात सुधारणा होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत असून बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची संपूर्ण आशिया खंडात ओळख आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगावची ओळख आहे. यांसह मोठ्या बाजारसमितीत कांद्याचे दार 500 ते 600 रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून झालेला खर्चही निघत नसल्याने ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. आता राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णयच किसान सभेने घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

कांद्याचा उत्पादन खर्च लांबच राहिला साधा कांद्याच्या काढणीचा खर्चही निघत नसल्याने वाहतुक खर्च खिशातून देण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. शेतकरी अडचणीत असतांना सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.

सरकार सत्तेत मशगूल आहे. कोणाचे आमदार अपात्र झे, कोणाला कोणते चिन्ह मिळणार, कोणाचे आमदार अपात्र होणार, सरकार राहणार की पडणार यामध्ये गुंतवून गेले आहे. त्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही म्हणत किसान सभेने जोरदार टीका करण्यात आली आहे.

सरकारने शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ नये यासाठी तातडीने मदत करावी अन्यथा शेतकरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या दारात कांदे ओतून आंदोलन करणार असल्याची भूमिका किसान सभेने घेतली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बारेगावी झालेल्या सभेत हा इशारा देण्यात आला आहे. किसान सभेचे माजी अध्यक्ष जे. पी. गावीत, किसान सभेचे केंद्रीय सहसचिव अजित नवले यांच्यासह विविध शेतकरी नेत्यांनी ही भूमिका घेतली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी किसान सभा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असून सरकार किसान सभेच्या इशाऱ्याची दखल घेऊन शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

कांद्याची बाजारपेठ असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा यासाठी मागील काही महिन्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली असली तरी सरकारने कुठलीही दाखल न घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.