AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही कसली दुश्मनी? शॉर्टसर्किटमुळे नव्हे तर शेजाऱ्यानेच लावली ऊसाला काडी

महावितरणकडून काही आर्थिक मदतही मिळेल असा आशावाद या शेतकऱ्यांना आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात वेगळाच प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्यानेच आकसापोटी तोडणी आलेल्या ऊसाला काडी लावल्याची घटना समोर आली आहे.

ही कसली दुश्मनी? शॉर्टसर्किटमुळे नव्हे तर शेजाऱ्यानेच लावली ऊसाला काडी
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर येथे दीड एकरातील ऊसाच्या फडालाच आग लावून दिल्याची घटना घडली आहे.
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 10:52 AM
Share

बीड : गेल्या दोन दिवसांमध्ये ऊसाला आग लागल्याच्या घटना (Marathwada) मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. या घटनांमधील अधिकच्या घटना ह्या विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीतून घडल्याचे समोर आले आहे. रविवारी लातूर आणि औरंगाबाद येथील टेम्भापूरी येथेही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. यामुळे महावितरणकडून काही आर्थिक मदतही मिळेल असा आशावाद या (Farmer) शेतकऱ्यांना आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात वेगळाच प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्यानेच आकसापोटी तोडणी आलेल्या (Sugarcane Fire) ऊसाला काडी लावल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे चंद्रकांत बुरगे यांचे नुकसान तर झालेच आहे पण ही कसली दुश्मनी असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे आता कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

दीड एकरावरील ऊस जळून खाक

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकासान झाले आहे. अधिकच्या पावसाचा केवळ ऊस या नगदी पिकावरच परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे ममदापूर येथील चंद्रकांत बुरगे यांना यातूनच अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा होती. शिवाय आता काही दिवसांमध्ये ऊस तोडणी होऊन कारखान्यावर जाणार होता. मात्र, शेजारच्यानेच उभा ऊस पेटवून दिल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. आतापर्यंत अनावधनाने अशा घटना झाल्याचे समोर आले होते. पण आकसापोटी शेतकऱ्याच्या मेहनतीवर अशाप्रकारे पाणी फेरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लाखो रुपयांचे नुकसान

ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. शिवाय खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते तर आता रब्बी हंगामात वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. असे असताना आता केवळ ऊसाचाच आधार होता. शिवाय त्याचा कालावधीही पूर्ण झाल्याने ऊसाची तोड अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. मात्र, या कृत्यामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न देखील उपस्थित झाल्याचे शेतकरी चंद्रकांत बुरगे यांनी सांगितले आहे. मात्र, लगतच्या ऊसाच्या फडातील पाचट जाळताना हा प्रकार झाल्याचे शेजारच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांचा नाद खुळा : वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी अनोखी शक्कल, दुहेरी फायदा

Summer Season : उन्हाळी सोयाबीनचा नवा प्रयोग, कसा होईल यशस्वी?

रब्बी हंगामातील पिकांचे योग्य व्यवस्थापनच उत्पादनवाढीचा मार्ग, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.