AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांचा नाद खुळा : वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी अनोखी शक्कल, दुहेरी फायदा

रब्बी हंगामातील पिके ही जोमात असतानाच (Wildlife) वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होत आहेच पण शेतकऱ्यांचे कष्टही वाढले आहे. सध्याच्या वाढत्या गारठ्यात पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये न जाता (Nanded Disrtict) नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अनोखीच शक्कल लढवत आहेत.

शेतकऱ्यांचा नाद खुळा : वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी अनोखी शक्कल, दुहेरी फायदा
वन्यप्रण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी शेतामध्ये लाऊडस्पीकर लावत आहेत.
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 01, 2022 | 9:33 AM
Share

नांदेड : आता वातावरण निवळले असून रब्बी हंगामातील पीके पुन्हा बहरु लागली आहेत. मात्र, शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. वातावरण पोषक असल्याने शेती कामांना गती आली आहे शिवाय मुबलक प्रमाणात पाणी असल्याने उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पाऊस, गारपिट तर मध्यंतरी वाढलेल्या थंडीमुळे पिकांचे संरक्षण करणे शेतकऱ्यांसाठी अव्हानात्मक होते. असे असताना योग्य वेळी औषध फवारणी करुन आता (Rabbi Season) रब्बी हंगामातील पिके ही जोमात असतानाच (Wildlife) वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होत आहेच पण शेतकऱ्यांचे कष्टही वाढले आहे. सध्याच्या वाढत्या गारठ्यात पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये न जाता (Nanded Disrtict) नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अनोखीच शक्कल लढवत आहेत. भीतीदायक आवाज रेकॉर्ड करून लाऊडस्पीकरवर रात्रभर लावण्यात येत आहेत. या वेगवेगळ्या आवाजामुळे वन्यप्राणी शेताकडे फिरकत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण तर होतच आहे पण शेतकऱ्यांची कष्टातूनही मुक्तता झाली आहे.

रब्बी हंगामातील पिकांची नासधूस

रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू, हरभरा ही पीके जोमात आहेत. यामध्ये रानडूकरांना खाण्यासारखे काही नसले तरी पिकांची नासाडी केली जाते. तर दुसरीकडे वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग लागवडीकडेही दुर्लक्ष केले आहे. कारण पेरणी पासून ते तोडणीपर्यंत पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना शेतावरच मुक्काम ठोकावा लागतो. दिवसेंदिवस रानडूकरांचा धोका वाढत आहे. शिवाय वनविभागाकडूनही कोणती कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील या भागात रोही, निलगायी आणि रानडुक्कर यांची संख्या मोठी असून रात्रीला शेतात येऊन ते पिकांची नासधूस करतात.

शेतकऱ्यांचे अनोखे जुगाड

दिवसभर शेतकरी हे शेतात असतात त्यामुळे या वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत नाही मात्र, रात्रीच्या वेळी शेतकरी घराकडे फिरकताच वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरु होतो. त्यामुळेच किनवट तालुक्यातील वनक्षेत्राच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी भीतीदायक आवाज रेकॉर्ड करून लाऊडस्पीकरवर रात्रभर लावले जातात. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला असून यामुळे वन्यप्राणी शेताकडे फिरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिकांचे रक्षण आणि शेतकऱ्यांचे कष्टही कमी झाले आहेत.

पीक संरक्षणाचे हे आहेत अन्य उपाय

विविध रंगांच्या साड्या पिकांच्या भोवती रोवल्या जातात. त्यामुळे रानडुकरांना शेतात कुणीतरी मानव असल्याचा भास होतो. त्यामुळे ते शेतात प्रवेश करण्यास भीतात. या पद्धतीचा जिथे मानवाची रेलचेल किंवा येणे-जाणे जास्त आहे, अशा भागात जास्त वापर होतो. तसेच रानडुकरांची दृष्टी आणि श्रवण हे दोन्हीही ज्ञानेंद्रीय ही कमकुवत असतात. याच ज्ञानेंद्रीयाच्या मदतीनेच ते आपले निवारा व अन्नाचा शोध घेत असतो.  शेतात हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरविल्याने अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्‍वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. मारठवाड्यात अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत.

संबंधित बातम्या :

Summer Season : उन्हाळी सोयाबीनचा नवा प्रयोग, कसा होईल यशस्वी?

रब्बी हंगामातील पिकांचे योग्य व्यवस्थापनच उत्पादनवाढीचा मार्ग, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

Crop Insurance : यंदाचाच नव्हे गेल्या तीन वर्षापासूनच्या पीकविमा रकमेच्या प्रतिक्षेत आहेत ‘या’ मंडळातील शेतकरी

Follow Us
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी