AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Insurance : यंदाचाच नव्हे गेल्या तीन वर्षापासूनच्या पीकविमा रकमेच्या प्रतिक्षेत आहेत ‘या’ मंडळातील शेतकरी

खरीप हंगामातील पीकविमा मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे, कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मराठावाड्यात अधिकतर तक्रारी ह्या उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातून झालेल्या आहेत. या तक्रारी केवळ यंदाचा विमा मिळाला नसल्याबाबतच्या आहेत. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात असे एक महसूल मंडळ आहे की, येथील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षातील पीकविम्याची प्रतीक्षा आहे.

Crop Insurance : यंदाचाच नव्हे गेल्या तीन वर्षापासूनच्या पीकविमा रकमेच्या प्रतिक्षेत आहेत 'या' मंडळातील शेतकरी
पीकविमा रकमेच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 31, 2022 | 4:10 PM
Share

उस्मानाबाद : खरीप हंगामातील पीकविमा मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे, कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मराठावाड्यात अधिकतर तक्रारी ह्या उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातून झालेल्या आहेत. या तक्रारी केवळ यंदाचा विमा मिळाला नसल्याबाबतच्या आहेत. मात्र, (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यात असे एक (Revenue Board) महसूल मंडळ आहे की, येथील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षातील (Crop Insurance) पीकविम्याची प्रतीक्षा आहे. विमा रक्कम अदा करुनही दरवर्षी पदरी निराशाच हे ठरलेले आहे. पीकविमा रकमेच्या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने, मोर्चे करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर आता अन्नत्यागाशिवाय पर्यायच उरला नसल्याचे म्हणत मुरुम मंडळातील शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनास सुरवात केली आहे. त्यामुळे पोशिंद्यावरच ही वेळ आली असून आता तरी त्यांना न्याय मिळतो का नाही हे पहावे लागणार आहे.

विमा कंपनी बदलल्यापासून अडचण कायम

उमरगा तालुक्यातील मुरुम मंडळातील पीकांचा विमा हा ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे अदा केला जात होता तेव्हा शेतकऱ्यांना नियमित विमा रक्कम मिळत होती. मात्र, गेल्या चार वर्षापासून बजाज अलायन्स कंपनीकडे मंडळ वर्ग झाल्यापासून शेतकऱ्यांना विमा परतावाच मिळालेला नाही. यासंदर्भात केवळ आश्वासनेच देण्यात आली आहेत. यंदा विमा रक्कम वितरीत होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे पण मंडळातील एकाही शेतकऱ्यास विमा मिळालेला नाही.

तीन वर्षापासून रखडला पीकविमा

उस्मानबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यासह अन्य भागात अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही, नुकसान झाल्याच्या 72 तासात तक्रार करूनही विमा दिला जात नाही , 2019 , 2020 व 2021 या 3 वर्षाचा विमा थकीत आहे , जो पर्यंत पिक विमा दिला जात नाही तोपर्यंत अन्न त्याग करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा विमा रक्कम रखडलेली असताना यंदा पुन्हा तक्रारी नोंदवून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष असल्याने आता शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली आहे.

काय आहे नियम?

पीक नुकसानीनंतर संबंधित शेतकऱ्यांनी केवळ 72 तासांच्या आतमध्ये झालेल्या नुकसानीची माहीती ही अॅपवरुन संबंधित विमा कंपनीला देणे गरजेचे आहे. त्यानंतर तीन दिवसांमध्ये विमा कंपनीचे प्रतिनीधी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र आहे की नाही यासाठी पीक पंचनामे केले जातात. विमा कंपनीचा प्रतिनीधी आणि कृषी विभागाकडून पंचनाम्याचा अहवाल सादर होऊनही या मुरुम मंडळातील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आता अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Agricultural prices : पणन मंडळाचा उपक्रम, आता घरबसल्याच शेतकऱ्यांना कळणार शेतीमालाचे दर

Kharif Season : हंगाम सुरु होताच तुरीची विक्रमी आवक, मोजमापसाठी दोन दिवसाचा कालावधी..!

Grape : द्राक्षाचे नुकसान आता बेदाणा निर्मितीच्याही वाढल्या अडचणी, काय आहेत समस्या ?

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?