AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या तापमानाचा केळी पीकावर परिणाम, तीन दिवसांपासून उष्णतेने जनता हैराण

तापमान ४४ अंशांवर, केळी उत्पादक हवालदील! केळीचे होतेय नुकसान, तीन दिवसांपासून उष्णतेने जनता हैराण

वाढत्या तापमानाचा केळी पीकावर परिणाम, तीन दिवसांपासून उष्णतेने जनता हैराण
banana
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 12, 2023 | 12:06 PM
Share

जळगाव : रावेर (Raver) गेल्या तीन दिवसांपासून रावेर आणि परिसरातील तापमानाने ४४ अंशांचा (jalgaon temprature) आकडा गाठला आहे. त्यामुळे केळीचे मोठे नुकसान होत आहे. सुरुवातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केळी पीकाला आडवे केले. आता पारा ४४ अंशांवर गेल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. तापमान सहनही होईना आणि सांगताही येईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (unseasonal rain) झाला आहे, त्याचबरोबर अजून देखील सुरु आहे. त्यामुळे राज्यातील हवामान सारखा बदल होतं आहे.

तालुक्यातील सावखेडा बु., सावखेडा खुर्द, रोझोदा, खिरोदा, लोहारा, चिंचाटी, जानोरी, गौरखेडा शिवारातील गारपीट व अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याच्या तडाख्यात नुकसान झालेल्या केळी बागांचे पंचनामे अद्याप पुर्ण केलेले नाहीत, तोच सतत तीन दिवस सूर्य आग ओकू लागल्याने तब्बल ४४ ते ४५ सेल्सिअस तापमानाच्या भट्टीत या केळी बागांची कमालीची होरपळ होत आहे. नेमकं काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

४२ अंशांपेक्षा जास्त सतत तीन दिवसांचे तापमान केळी बागांकरिता घातक मानले जाते. सकाळीपासून कडक उन्हं असल्यामुळे, मनवेल ता. यावल परिसरातील केळी बागा उन्हामुळे करपू लागल्या आहेत. त्यामुळे आता केळी उत्पादन नेमकं काय करावं अशा विचारात आहेत. किती होते, यावर प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील सुमारे २२ हजार हेक्टरवरील केळी बागांना असा उष्णतेच्या सूर्य प्रकोपात केळी उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण तरी कोण देणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, उष्णतेचा प्रकोप म्हणून नैसर्गिक आपत्ती पाहता केंद्र व राज्य सरकारनेही केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प