AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Untimely Rain: कोकणातही अवकाळीची अवकृपा, वादळी वाऱ्यामुळे आंबा गळती तर काजू बागांचे नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा (Untimely Rain) अवकाळीचा फटका रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबागांना बसत आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्षबागांचे नुकसान झाल्यानंतर आता अवकाळीने कोकणाकडे कूच केलेली आहे. या भागात रब्बी हंगामाचे नाही पण (Mango) आंबा आणि काजूच्या बागांना धोका निर्माण झालेला आहे. सकाळपासून उकाडा आणि दुपारुन हवेत गारवा निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसामुळे आंबागळ तर काजू बागांची पडझड सुरु झाली आहे.

Untimely Rain: कोकणातही अवकाळीची अवकृपा, वादळी वाऱ्यामुळे आंबा गळती तर काजू बागांचे नुकसान
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 4:57 PM
Share

सिंधुदुर्ग: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा (Untimely Rain) अवकाळीचा फटका रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबागांना बसत आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्षबागांचे नुकसान झाल्यानंतर आता अवकाळीने (Kokan) कोकणाकडे कूच केलेली आहे. या भागात रब्बी हंगामाचे नाही पण (Mango) आंबा आणि काजूच्या बागांना धोका निर्माण झालेला आहे. सकाळपासून उकाडा आणि दुपारुन हवेत गारवा निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसामुळे आंबागळ तर काजू बागांची पडझड सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून आंबा बागांवर अवकाळीची अवकृपा राहिली असून अंतिम टप्प्यातही कायम आहे. आता होत असलेले नुकसान न भरुन निघणारे आहे. यापुर्वीच वातावरणातील बदलाचा परिणाम उत्पादनावर झालेला आहे. असे असतानाच बुधवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांपुढे अजून कोणते संकट मांडून ठेवले हाच सवाल प्रत्येकाच्या मनात आहे.

अर्धा तासाच्या पावसाने पाणी-पाणी

सिंधुदुर्ग शहरासह परिसरात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. अवघ्या अर्ध्यातासाच्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी-पाणी झाले तर दुसरीकडे वाऱ्यामुळे आंबा गळतीचा धोका कायम आहे. आता कुठे आंबा पीक पदरात पडेल असे चित्र होते होते पण अगदी अंतिम टप्प्यात झालेल्या या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका

निसर्गाचा लहरीपणा आणि द्राक्ष उत्पादकांनी त्याच्याशी केलेले दोन हात. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण द्राक्षतोड होत असतानाही निसर्गाने द्राक्ष उत्पादकांवर कृपादृष्टी दाखवलेली नाही. अखेर नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. यापुर्वी अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव नंतर वाढत्या थंडीतून बचाव व्हावा म्हणून रात्रीचा दिवस करुन द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या हे सर्व करुन आता कुठे तोड सुरु असताना होत असलेल्या पावसामुळे द्राक्षांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. एकीकडे दर्जा खालावला म्हणून अपेक्षित दर नाही हे कमी म्हणून की काय आता होत असलेल्या पावसामुळे द्राक्ष विक्री होते की नाही याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री

पुनर्वसनातील राखीव जमिनीचे सोडा हक्काच्या शेतजमिनीवरही पीक घेणे मुश्किल, नांदेडचे शेतकरी रब्बीला मुकले

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.