AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री

खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असून आता साठवणूक करुन ठेवलेल्या सोयाबीनची आवक वाढली आहे तर दुसरीकडे हमीभावापेक्षा तुरीला बाजारपेठेत अधिकचा दर मिळत असल्याने तुरीचीदेखील आवक वाढलेली आहे. एकंदरीत जे सबंध हंगामात घडले नाही ते अंतिम होताना पाहवयास मिळत आहे. गेल्या अनेक दिवसानंतर शेतीमालाची आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु झाली आहे.

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री
बाजार भावापेक्षा हमीभाव केंद्रावर तुरीला अधिकचा दर असल्याने खरेदी केंद्रावर आवक वाढली आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 09, 2022 | 3:11 PM
Share

लातूर : (Kharif Season) खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असून आता साठवणूक करुन ठेवलेल्या सोयाबीनची आवक वाढली आहे तर दुसरीकडे हमीभावापेक्षा तुरीला बाजारपेठेत अधिकचा दर मिळत असल्याने (Toor Arrival) तुरीचीदेखील आवक वाढलेली आहे. एकंदरीत जे सबंध हंगामात घडले नाही ते अंतिम होताना पाहवयास मिळत आहे. गेल्या अनेक दिवसानंतर शेतीमालाची आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु झाली आहे. (Soybean) सोयाबीन आणि तुरीच्या दरात सुधारणा झाल्याने यांची आवक वाढली असली तरी हरभऱ्याला हमीभावपेक्षा कमी दर असतानाही विक्रमी आवक होत आहे हे विशेष. सध्या राज्यात हरभरा खरेदी केंद्रही सुरु झालेली आहेत मात्र, केंद्रावरील किचकट प्रक्रिया आणि पैशासाठी होणारा विलंब यामुळे नुकसान होत असतानाही शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत आहे. बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 500 ते 4 हजार 600 असा दर मिळत आहे. तर हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला आहे.

तूर,हरभऱ्याची खरेदी केंद्र

खरीप हंगामातील तुरीसाठी तर रब्बी हंगामातील हरभऱ्यासाठी नाफेडच्यावतीने राज्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे खऱीप हंगामातील तुरीचे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून सध्या हमीभावापेक्षा बाजारपेठेत तुरीला अधिकचा दर आहे. हंगामाच्या सुरवातीला तुरीला 5 हजार 800 रुपये क्विंटल असा दर होता तर आता 6हजार 400 रुपये दर झाला आहे. हमीभाव केंद्रावर नाफेडच्यावतीने 6 हजार 300 रुपये दर आकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे हरभऱ्याला हमीभाव केंद्रावर अधिकचा दर असतानाही शेतकरी हे खुल्या बाजारातच विक्री करीत आहेत. मात्र, सध्या बाजारपेठेत शेतीमालाची आवक वाढल्याने रेलचेल सुरु झाली आहे.

सोयाबीन स्थिरावले आवक मात्र कायम

चालू आठवड्यात सोयाबीनचे दर हे 7 हजार 300 वरच स्थिर आहेत. गतआठवड्यात दरात चढ-उतार झाल्याने नेमके काय होणार याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका होती. पण अखेर सोयाबीन स्थिरावले असले तरी शेतकऱ्यांना अजूनही वाढीव दराची अपेक्ष आहे. हंगामाच्या सुरवातीला 4 हजार 800 असलेले सोयाबीन आता 7 हजार 300 वर गेले असतानाही वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवरच भर देत आहेत. पण गेल्या 4 दिवसांपासून आवक स्थिर असतनाही 20 हजार पोत्यांची आवक ही सुरु आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस

पुनर्वसनातील राखीव जमिनीचे सोडा हक्काच्या शेतजमिनीवरही पीक घेणे मुश्किल, नांदेडचे शेतकरी रब्बीला मुकले

उत्पादकता हरभऱ्याची की शेतकऱ्यांच्या नुकसानीची, कृषी विभागाच्या अहवालामुळे शेतकरीही चक्रावले!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली