Mango Rate : बाजारात उशिरा एंन्ट्री तरीही ‘राजा’चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर

आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे. यंदा तर अनेक संकटावर मात करीत हा राजा डौलत कोकणातून संपूर्ण महाराष्ट्राकत दाखल होत आहे. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची एंन्ट्री झाली होती.

Mango Rate : बाजारात उशिरा एंन्ट्री तरीही 'राजा'चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर
देवगड हापूसचे महत्व कायम रहावे म्हणून आता खरेदी केंद्रवर शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 11:25 AM

कोल्हापूर : आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात (Hapus Mango) हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे. यंदा तर अनेक संकटावर मात करीत हा राजा डौलत (Kokan) कोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत आहे. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची एंन्ट्री झाली होती. आता वातावरण निवळले असून हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल होत आहे. (Kolhapur Market) कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले असून मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 5 डझनाच्या पेटीला तब्बल 40 हजार 599 असा दर मिळालेला आहे. अर्थात एका आंब्यासाठी व्यापाऱ्याला 676 रुपये मोजावे लागले आहेत. वातावरणातील बदलामुळे यंदा देवगडचा हापूस बाजारात उशिराने दाखल होत आहे. मात्र, खवय्यांना त्याचीच प्रतिक्षा असून दराचा विचार न करता खरेदी केली जात आहे.

चव अन् सुगंधामुळे खवय्येगिरांना भुरळ

कोल्हापूरात कोकणासह कर्नाटकातून हापूस आंब्याची आवक होत असते. कोकणातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, मालवण यासह किनारपट्टीच्या भागातून आवक होत असते. दरवर्षी कोल्हापूरातील खवय्येगिरींना हापूसच्या आगमानाची मोठी उत्सुकता असते. रत्नागिरी हापूस आंबा आकाराने लहान असला तरी त्याचा सुगंध आणि चव अप्रतिम असल्याने ग्राहकांना त्याची प्रतिक्षा असते. यंदा पहिल्या टप्प्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले होते. त्यानंतर आता कोल्हापुरात आगमन झाले आहे.

एका आंब्याची किंमत 676 रुपये

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 डझनाची एक पेटी दाखल झाली आहे. बाजारात हापूस आंबा दाखल होताच त्याच्या सौद्याला सुरवात झाली होती. मुहूर्ताच्या हापूसला दरवर्षीच विक्रमी दर मिळतो. गतवर्षी 625 रुपयांना एक आंबा पडला होता तर यंदा 676 रुपायांना. 5 डझनाची एक पेटी ही तब्बल 40 हजार 599 रुपायांना विकली गेली आहे. हे मुहूर्ताचे दर असले तरी यंदा घटलेले उत्पादन आणि निसर्गाची अवकृपा यामुळे दर चढेच राहतील असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.

15 जूनपर्यंत सुरु राहणार आवक

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा आवक थोडीफार उशिराने झाली असली तरी 15 जूनपर्यंत हापूस आंब्याची आवक सुरु राहणार आहे. हंगामाच्या सुरवातीला मुंबई येथे आवक सुरु होते. कारण येथील वातावरण आंबा पिकवण्यासाठी पोषक असते. त्यामुळे 4 ते 5 दिवस आगोदर आंबा दाखल झाला तरी काही परिणाम होत नाही. मात्र, कोल्हापूरात एक दिवस आगोदरच हापूस आंबा दाखल होता. आता 15 जूनपर्यंत आवक सुरु राहणार असल्याने खवय्येगिरांना चव चाखता येणार आहे.

संबंधित बातम्या :

Onion Market: आता गावरान कांद्याची चलती, आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिरावलेले

पेरले ते उगवले मात्र, पदरात नाही पडले, मुख्य आगारात हळदीचा रंग झाला फिक्कट, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

‘नर्सरी हब’ सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना काय?

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.