AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer in Tension : मंगू रोगाने मोसंबीचा गोडवा चोरला; शेतकऱ्यांची वाढली चिंता, पपईसह तुरीवर दवाळ रोगाचं सावट

Mosambi, Papaya, Tur Farmers : थंडी आणि मंगू रोगाने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर पपई आणि तुरीवर सुद्धा संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Farmer in Tension : मंगू रोगाने मोसंबीचा गोडवा चोरला; शेतकऱ्यांची वाढली चिंता, पपईसह तुरीवर दवाळ रोगाचं सावट
रोगामुळे शेतकरी अडचणीत
| Updated on: Jan 04, 2025 | 12:24 PM
Share

थंडी आणि मंगू रोगाने मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. इतकेच नाही तर पपई आणि तूर हे पीक सुद्धा संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान बदलाचा मोठा फटका या पिकांना बसला आहे. जालनासह नागपूर आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर त्यामुळे संकट उभे ठाकले आहे.

20 हजार हेक्टर क्षेत्र मोसंबी संकटात

उत्तर भारतात पसरलेल्या थंडीचा परिणाम आता जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी वर्गावर झालाय.मालाचे घसरलेले दर पाहता अजून दोन दिवस मोसंबी बाजारपेठ अजुन दोन दिवस बंद राहणार आहे. अश्यातच मोसंबी विकसित होण्याच्या स्थितीत असताना मंगू रोगाचं सावट पसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला. जिल्ह्यात जवळ पास 20 हजार हेक्टर क्षेत्र मोसंबीची लागवड झाली असल्याने संक्रांती नंतर तरी भाव वाढ होईल का अशी आशा शेतकरी व्यक्त करतं आहे.

नंदुरबारमधील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पपई लागवड केली आहे. वातावरणातील सततच्या बदलावामुळे पपई पिकावर मोझेक व डावनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या संपूर्ण पपईच्या बागाच धोक्यात आल्याने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. मोझेक रोगामुळे पपईची पान पिवळी पडुन गळून पडत आहेत. त्याचा फटका पपईला बसला आहे. कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन केले जात असे, मात्र काही शेतकर्‍यांनी लवकर पेरणी केल्याने पिकांची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे अंतर मशागतीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा, दादर, भुईमूग, या पिकांची पेरणी करण्यात आली असून या पिकांना खते देणे, कोळपणी निंदणी आदी कामांना वेग आला आहे.

खताचे दर वाढल्याने शेतकरी अचडणीत

नंदुरबार जिल्ह्यात शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच खतांच्या किमती वाढणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकर्‍यांची झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाचे पेरण्या पूर्ण झाल्या असून आता खत दिले जाणार आहे .मात्र ऐन हंगामाच्या वेळेस खतांचे दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

अमरावतीत तुरीवर दवाळ रोगाचे सावट

अमरावती जिल्ह्यात अनेक भागात तूर पिकावर दवाळ रोगाच सावट आले आहे. दवाळ रोगामुळे हिरवीगार तूर करपली आहे. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचा तूर उत्पादनात मोठा फटका दिसले. उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तर हे नुकसान विमा कंपनीच्या निकषात बसत नसल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत अडकला आहे.

अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल.
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत.
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.