AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औषधी वनस्पतीची शेती, 10 हजार रुपये क्विंटल असलेल्या वनस्पतीची भारतातून जगभरात निर्यात

आता शेतीचे स्वरुप बदलत आहे. ज्यामधून अधिकचे उत्पादन त्याची लागवड असाच प्रयत्न आता शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. त्यामुळे औषधी वनस्पतीवर भर दिला जात आहे. या वनस्पती उपयोगीही पडत आहेत आणि त्यामधून उत्पन्नही मिळत आहे. सर्पगंधक ही वनस्पती त्यापैकीच एक आहे.

औषधी वनस्पतीची शेती, 10 हजार रुपये क्विंटल असलेल्या वनस्पतीची भारतातून जगभरात निर्यात
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 06, 2021 | 5:26 PM
Share

मुंबई : आता शेतीचे स्वरुप बदलत आहे. ज्यामधून अधिकचे उत्पादन त्याची लागवड असाच प्रयत्न आता शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. त्यामुळे  ( Herbs) औषधी वनस्पतीवर भर दिला जात आहे. या वनस्पती उपयोगीही पडत आहेत आणि त्यामधून उत्पन्नही मिळत आहे. सर्पगंधक ही वनस्पती त्यापैकीच एक आहे. तर अशा काही औषधी वनस्पती आहेत ज्या ( exports from India,) भारतात सर्वात जास्त उत्पादित केल्या जातात आणि शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जातात आणि जगातील बऱ्याच देशांमध्ये निर्यात केल्या जातात.

यामधून परकीय चलन तर मिळतेच पण जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण होते. इसबगोल ही सुद्धा अशीच वनस्पती आहे. एकट्या भारत देशामध्ये एकूण उत्पादनाच्या 80 टक्के उत्पादन होत आहे. औषधी पिकांच्या निर्यातीत इसबगोल प्रथम क्रमांकावर आहे. दरवर्षी इसबगोलची निर्यात ही 120 कोटी रुपयांची होते. या औषधी वनस्पतीचे इराण, इराक, अरब अमिराती, भारत आणि फिलिपाईन्स हे जगातील प्रमुख उत्पादक आहेत. भारतात गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर इसाबगोलची लागवड करतात.

प्रति क्विंटल 10,000 रुपये

रबी हंगामात म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इसबगोलची लागवड केली जाते आणि मार्च महिन्यापर्यंत याला पीक लागते. त्याची झाडे हळूहळू वाढतात आणि हाताने ते काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. एक वेळेस लागवड केल्यावर कमीत कमी एकरी 4 क्विंटल उत्पादन मिळते. सध्या एक क्विंटलचा दर 10, 000 रुपये आहे. एका हेक्टरमध्ये इसबगोलचे 15 क्विंटल बियाणे मिळते. याशिवाय हिवाळ्यात इसबगोलच्या किंमती वाढतात, ज्यामुळे उत्पन्न आणखी वाढते. इसबगोलच्या बियाण्यावर प्रक्रिया केली तर ती अधिक फायदेशीर ठरते. या प्रक्रियेनंतर इसबगोलच्या बियांपैकी सुमारे 30 टक्के बिया भुसा तयार करतात आणि हा इसबगोलचा सर्वात महागडा भाग मानला जातो. इसबगोलच्या लागवडीतून भुसा सोडल्यानंतर खली आणि गोली सारखी इतर उत्पादने सोडली जातात. जे दीड लाख रुपयांपर्यंत विकले जातात.

हस्कमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत

इसबगोलच्या भुसामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. इसबगोलमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉल अजिबात नसते. इसबगोल सर्व वयोगटातील नागरिक खाऊ शकतात.

संबंधित बातम्या :

आणेवारी सुधारली, शेतकऱ्यांची चिंता वाढली, यवतमाळ जिल्ह्याबाबत महसूल विभागाचा अहवाल

दुष्काळात तेरावा ; अवकाळी पावसामुळे लागवडीपूर्वीच कांद्याचा ‘वांदा’

रब्बी हंगामातील कांदा ; लागवडीपासून काढणीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.