AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचा सल्ला, दर वाढीमागचे गणितही कळाले

नाही म्हणलं तरी सोयाबीनने आता 6 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे आता तरी सोयाबीनची आवक वाढेल असा अंदाज व्यापारी बांधत असतील तो चुकीचा ठरणार आहे. कारण आवक कमी तर सोयाबीन रास्त भाव हे पक्के गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतले आहे.

सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचा सल्ला, दर वाढीमागचे गणितही कळाले
सोयाबीन दराबाबत अशाप्रकारे सोशल मिडीयावर माहिती दिली जात आहे
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 2:57 PM
Share

लातूर : नाही म्हणलं तरी (Soybean Rate) सोयाबीनने आता 6 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे आता तरी सोयाबीनची आवक वाढेल असा अंदाज व्यापारी बांधत असतील तो चुकीचा ठरणार आहे. कारण आवक कमी तर सोयाबीन रास्त भाव हे पक्के गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतले आहे. एवढेच नाही तर सोशल मिडीयावर शेतकरी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या दराची माहिती घेऊन सोयाबीन विक्रीबाबत सल्ला देत आहेत. यापूर्वी व्यापारीच दराबाबत सल्ला देत होते पण आता ही भूमिकाही शेतकरीच पार पाडत आहेत.

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. ती अद्यापही सुरुच आहे. मात्र, या दरम्यान महत्वाची गोष्ट ठरली आहे ती म्हणजे बाजारात मर्यादेत होणारी आवक. मागणीनुसारच सोयाबीनचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच दर एकतर स्थिर राहत आहेत किंवा वाढत आहेत.

सोशल मिडीयावरही सोयाबीन दराचीच चर्चा

मध्यंतरी सोयाबीनचे दर वाढावे म्हणून शेतकरी मुलांनी सोशल मिडीयावर एक ट्रेंड सुरु केला होता. अगदी त्याप्रमाणेच सध्या सोशल मिडियावर सोयाबीनच्या दराला घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. सध्याचे दर केवळ बाजारात आवक कमी होत असल्याने मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा गडबड न करता वाढीव दराची प्रतिक्षा करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला जात आहे. एवढेच नाही तर प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर हे सांगितले जात आहेत. त्यामुळे कोणत्या बाजारसमितीमध्ये काय दर चालू आहे याची माहितीही शेतकऱ्यांना होत आहे.

लातूर बाजार समितीमध्ये 15 हजार पोत्यांची आवक

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोयाबीनचे दर हे स्थिर राहिले आहेत. मात्र, असे असतानाही सोयाबीनच्या आवकमध्ये जास्तीचा फरक पडलेला नाही. मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 हजार पोत्यांची आवक झाली होती तर बुधावारी 15 हजार पोत्यांची. त्यामुळे दरात चढउतार झाला तरी मात्र, आवकचा आकडा हा शेतकऱ्य़ांनी निश्चित केला आहे. बाजार समितीशिवाय प्रक्रिया उद्योगाकडूनही सोयाबीनची मागणी होत आहे. पण मागणीच्या तुलनेच पुरवठा होत नसल्याने सोयाबीनचे दर हे टिकून आहेत.

6 हजार 450 वर सोयाबीनचे दर स्थिर

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कायम वाढ होत होती. मात्र, मंगळवारपासून सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. असे असले तरी सोयाबीनची आवक ही मर्यादितच आहे. बुधवारी सोयाबीनला 6 हजार 450 चा दर मिळाला तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 हजार पोत्यांची आवक राहिली होती. मात्र, सोशल मिडियावरील सल्ला आत्मसात करुन सोयाबीन खरेदी-विक्रीचा आधार शेतकरी घेत आहेत.

संबंधित बातम्या :

Weather: काय आहे ‘सी बँड डॉपलर रडार’? आसमानी संकट झेलणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

ऐतिहासिक वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी, 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

रिलायन्सचा कारभार : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकिवले 244 कोटी रुपये, एकाही शेतकऱ्याला परतावा नाही

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.