AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन बहर, फळगळतीमुळे मोसंबी बागांवर संकट; तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर

Mosambi-Tur Farmers : बाजार भाव आणि फळगळतीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने मदत करण्याची मागणी होत आहे.

दोन बहर, फळगळतीमुळे मोसंबी बागांवर संकट; तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर
मोसंबी, तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर
| Updated on: Jan 07, 2025 | 10:07 AM
Share

सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी, सोयबीन आणि तूर उत्पादकांवर जणू संकट कोसळले आहे. लहरी हवामान आणि सरकारी धोरणाच्या कात्रीत हा शेतकरी वर्ग सापडला आहे. एकीकडे कमी भाव तर दुसरीकडे रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. इंटरनेट, AI च्या या जमा‍न्यात या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी कृषी विभागकडे एकही सक्षम यंत्रणा नसल्याचे शल्य त्याहून अधिक आहे. तर दुसरीकडे नवीन तूर बाजारात येताच भाव कोसळला.  त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. केंद्र सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोसंबीला कवडीमोल भाव

मोसंबीच्या मृगबहाराच्या तोडणीला आलेल्या मोसंबीला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. बदलते वातावरण आणि उत्तर भारतात पसरलेल्या थंडीचा परिणाम दिसत आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. मृग बहरातील मोसंबीची फळे परिपक्व होऊन तोडण्याच्या अवस्थेत आहे. मात्र बाजार भाव आणि मोसंबीची फळगळ होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एक महिन्यापूर्वी 35 ते 40 रुपये किलो दराने विकत असलेली मोसंबी थेट 8 ते 10 रूपयांवर आल्यामुळे मोसंबीवर केलेला खर्च ही निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

मोसंबी परिपक्व होत असताना मंगू रोगाचं सावट पसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात जवळ पास 20 हजार हेक्टर क्षेत्र मोसंबीची लागवड झाली आहे. पण या रोगाच्या प्रादुर्भावाने फळगळती होत आहे. असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

तुरीचा भाव कोसळला, शेतकर्‍यांना मोठा फटका

शेतकर्‍यांची नवीन तूर बाजारात येताच तुरीचे भाव प्रति क्विंटल 3 हजार रूपयांनी कोसळले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 6 हजार ते 7 हजार पर्यंतच भाव मिळाला आहे. एक महिन्यापूर्वी तुरीचे भाव 10 हजारापर्यंत होते, पण आता नवीन पीक येताच, शेतकर्‍यांची तूर बाजारात येताच भाव कोसळले. व्यापार्‍यांनी तुरीचे भाव पाडल्याचा शेतकर्‍यांचा आरोप तर केंद्र सरकारने आयात केलेला तुरीमुळे ही भाव कोसळल्याचा आरोप होत आहे. दवाळ रोगाचे सावट असताना पण शेतकर्‍यांनी केलेल्या मेहनतीला चांगले फळ आले होते. पण आता भाव कमी झाल्याने शेतकरी नाराज झाला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...