AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन बहर, फळगळतीमुळे मोसंबी बागांवर संकट; तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर

Mosambi-Tur Farmers : बाजार भाव आणि फळगळतीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने मदत करण्याची मागणी होत आहे.

दोन बहर, फळगळतीमुळे मोसंबी बागांवर संकट; तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर
मोसंबी, तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर
| Updated on: Jan 07, 2025 | 10:07 AM
Share

सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी, सोयबीन आणि तूर उत्पादकांवर जणू संकट कोसळले आहे. लहरी हवामान आणि सरकारी धोरणाच्या कात्रीत हा शेतकरी वर्ग सापडला आहे. एकीकडे कमी भाव तर दुसरीकडे रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. इंटरनेट, AI च्या या जमा‍न्यात या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी कृषी विभागकडे एकही सक्षम यंत्रणा नसल्याचे शल्य त्याहून अधिक आहे. तर दुसरीकडे नवीन तूर बाजारात येताच भाव कोसळला.  त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. केंद्र सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोसंबीला कवडीमोल भाव

मोसंबीच्या मृगबहाराच्या तोडणीला आलेल्या मोसंबीला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. बदलते वातावरण आणि उत्तर भारतात पसरलेल्या थंडीचा परिणाम दिसत आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. मृग बहरातील मोसंबीची फळे परिपक्व होऊन तोडण्याच्या अवस्थेत आहे. मात्र बाजार भाव आणि मोसंबीची फळगळ होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एक महिन्यापूर्वी 35 ते 40 रुपये किलो दराने विकत असलेली मोसंबी थेट 8 ते 10 रूपयांवर आल्यामुळे मोसंबीवर केलेला खर्च ही निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

मोसंबी परिपक्व होत असताना मंगू रोगाचं सावट पसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात जवळ पास 20 हजार हेक्टर क्षेत्र मोसंबीची लागवड झाली आहे. पण या रोगाच्या प्रादुर्भावाने फळगळती होत आहे. असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

तुरीचा भाव कोसळला, शेतकर्‍यांना मोठा फटका

शेतकर्‍यांची नवीन तूर बाजारात येताच तुरीचे भाव प्रति क्विंटल 3 हजार रूपयांनी कोसळले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 6 हजार ते 7 हजार पर्यंतच भाव मिळाला आहे. एक महिन्यापूर्वी तुरीचे भाव 10 हजारापर्यंत होते, पण आता नवीन पीक येताच, शेतकर्‍यांची तूर बाजारात येताच भाव कोसळले. व्यापार्‍यांनी तुरीचे भाव पाडल्याचा शेतकर्‍यांचा आरोप तर केंद्र सरकारने आयात केलेला तुरीमुळे ही भाव कोसळल्याचा आरोप होत आहे. दवाळ रोगाचे सावट असताना पण शेतकर्‍यांनी केलेल्या मेहनतीला चांगले फळ आले होते. पण आता भाव कमी झाल्याने शेतकरी नाराज झाला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.