नांदेड: महाराष्ट्रात यंदा अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं आलेल्या मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आता नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरसकट पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीय.