AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा सानुग्रह अनुदानासाठी किती अर्ज? कांद्याच्या पंढरीतील केंद्रांवर अद्यापही गर्दी; शेतकऱ्यांची मागणी काय?

कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्याचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले असले तरी अद्यापही मोठी गर्दी अर्ज करण्यासाठी होत आहे.

कांदा सानुग्रह अनुदानासाठी किती अर्ज? कांद्याच्या पंढरीतील केंद्रांवर अद्यापही गर्दी; शेतकऱ्यांची मागणी काय?
Image Credit source: Google
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 20, 2023 | 4:04 PM
Share

नाशिक : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये लाल कांद्याचे बाजार भाव कोसळल्यानंतर हवालदील झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने लाल कांद्याला सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये प्रमाणे दोनशे क्विंटल पर्यंत ई पिकपेरा लावलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला जाहीर केले होते. या सानुग्रह अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. आज अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. सानुग्रह अनुदानासाठी काही अटी पूर्ण करता येत नसल्याने शेतकऱ्यांनी अर्जप्रणालीकडे पाठही फिरवली आहे.

18 एप्रिल पर्यंत नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांपैकी सुरगाणा, घोटी बुद्रुक वगळता 15 बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याचे सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी एक लाख 41 हजार 545 अर्ज दाखल झाले आहे.

यामध्ये 68 हजार 888 अर्ज दाखल झाले असून त्यात सातबारा उताऱ्यावर कांदा पिकांची खरीप ई पिकपेरा नोंद लावलेले अर्ज आहे. तर 72 हजार 657 अर्जंच्या उताऱ्यावर कांदा पिकांची ई पिकपेरा नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यामुळे ई पिकपेऱ्याची अट रद्द करत अर्ज दाखल करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढवून द्यावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे. कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी अखेरच्या दिवशीही गर्दी केली आहे.

कांदा उत्पादक शेतकरी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यात यंदाच्या वर्षी कांद्याला मिळणारा भाव बघता झालेला उत्पादन खर्चही निघत नाहीये. त्यामुळे लाल कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यावरुण ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते.

नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटकुटीला आला होता. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट अशा दुहेरी संकटाचा सामना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच मागील आठवड्यात अवकळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे सरकारने दिलेले सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना दोन पैसे देईल. त्यातून पुढील पिकासाठीचे भांडवल तयार करण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने अनेक जन अर्ज दाखल करत आहे. त्यामध्ये अनेकांनी ई पीकपेरा नोंद ही अट रद्द करावी अशी मागणी केली असून मुदत वाढ करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!