AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural : निधीची चिंता सोडा, वर्ल्ड बॅंकेच्या सहकार्याचे चीज करा..! अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, ज्या कृषि योजना आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शिवाय वेळेत योजना मार्गी लागल्या तर त्यामधील निधीही परत जात नाही. शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा महत्वाचा आहे.

Agricultural : निधीची चिंता सोडा, वर्ल्ड बॅंकेच्या सहकार्याचे चीज करा..! अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: twitter
| Updated on: Jul 07, 2022 | 7:36 PM
Share

मुंबई :  (Eknath Shinde) शिंदे गट आणि (BJP) भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे सत्र हे सुरुच आहे. गुरुवारी सायंकाळी विविध क्षेत्रातील कामांचा आढावा घेताना रखडलेल्या (Agricultural Scheme) कृषी योजना मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला जागतिक बॅंकेने 3 हजार कोटांचे सहकार्य केले आहे. त्यामुळे निधीची चिंता नाही. आगामी काळात हे काम जलदगतीने पूर्ण व्हावेत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. तर मध्यंतरी हे काम कोरोनामुळे रखडले असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असली

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न

केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, ज्या कृषि योजना आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शिवाय वेळेत योजना मार्गी लागल्या तर त्यामधील निधीही परत जात नाही. शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा महत्वाचा आहे. त्यामुळे याला गती दिली तरी शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.

यंत्रणाशी संबंध ठेवा अन् प्रकल्प राबवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. या बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

शिंदेंची सावरासावर, फडणवीसांची टिका

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने 3 हजार कोटींपर्यंतचा निधी दिला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात केवळ 15 कोटी निधी खर्ची झाल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तर दरम्यानच्या काळात कोरोनामुळे या योजनेतील कामांना गती मिळाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली नाहीतर प्रोजेक्ट पूर्ण होण्यावर भर दिला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.