AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia : पाऊस आला धाऊन, पिकं गेली वाहून, गोंदियात 208 हेक्टरातील पिकांवर पाणी, कृषी विभागाचे धोरण काय?

खरीप हंगामातील काही क्षेत्रावर धान पिकांची लागवड करताच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांची पाहणी करणेही शक्य नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने कृषी विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत.

Gondia : पाऊस आला धाऊन, पिकं गेली वाहून, गोंदियात 208 हेक्टरातील पिकांवर पाणी, कृषी विभागाचे धोरण काय?
पावसाचे पाणी शेतमजमिनीत साचल्याने धान पिकांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 23, 2022 | 11:02 AM
Share

गोंदिया : जुलैच्या पहिल्या दिवसापासून राज्यात पावसाने हाहाकार घातला आहे. (Vidarbha Farmer) विदर्भावर पावसाची कधी नव्हे ती अधिकची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यामुळे हा पाऊस नुकसानीचा ठरलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस हा सुरुच आहे. यामुळे धोका अद्यापही टळलेला नाही. मध्यंतरी सलग 15 ते 20 दिवस झालेल्या पावसामुळे (Kharif Season) खरिपातील पिके तर वाहून गेलीच आहेत पण शेत जमिनीही खरडून गेल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात आहे. कृषी विभागाकडून आता पीक पाहणी आणि पंचनाम्याला सुरवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल 208 हेक्टरावरील (Paddy Crop) धान पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय 8 दिवसांमध्ये या संदर्भातला अहवाल तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंचानाम्याला सुरवात

खरीप हंगामातील काही क्षेत्रावर धान पिकांची लागवड करताच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांची पाहणी करणेही शक्य नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने कृषी विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत. आतापर्यंतच्या पाहणीतून धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरवात झाली असून आर्थिक मदत मिळे असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस

विदर्भात दरवर्षी कमी पावसामुळे धान पिकाची लागवड होत नाही. पण यंदा चित्र बदलले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने असे काय थैमान घातले आहे त्यामुळे लागवड झालेल्या क्षेत्रातील पिकांवर पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाढ तर खुंटलीच आहे पण सततच्या पावसामुळे पाण्याचा निचराही होत नाही. हंगामाच्या सुरवातीलाच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने उत्पादन घटण्याचा धोका कायम आहे. पंचनाम्यांना सुरवात झाली असून मदतीबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

धान पिकाचे सर्वाधिक नुकसान

धान पीक हेच खरिपातील मुख्य पीक आहे. अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र, काही क्षेत्रात लागवड होताच सुरु झालेला पाऊस हा सलग 20 दिवस कायम राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील 208 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय आणखी वाढ होईल असाही अंदाज कृषी विभागाचा आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा विदर्भातील शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन